समान नागरी कायद्याबाबत मोठी अपडेट! मुख्यमंत्र्यांनी केली थेट घोषणा; पुढील 6 महिन्यात…
राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यापूर्वी या कायद्याचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. आता विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नावे जाहीर केली आहेत.
राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यापूर्वी या कायद्याचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. आता विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नावे जाहीर केली आहेत.
माजी न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत माजी महाअधिवक्ता रमेश पतंगे, घटनातज्ज्ञ सुवर्णा रावल आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे.
ही समिती पुढील 6 महिन्यांत समान नागरी कायद्याचा अभ्यास करून आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर करणार आहे. त्यानंतर या अहवालाच्या आधारे कायद्याचा मसुदा तयार केला जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात हा मसुदा दोन्ही सभागृहांसमोर मांडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून कायदा करण्याची कार्यवाही केली जाईल.
