मुंबई: महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. रोजगार बंद होण्याचा भीतीनं राज्यातील परप्रांतीय मजूर त्यांच्या मूळगावी परतत आहेत. मंबईतील प्रमुख रेल्वेस्थानक लोकमान्य टिळक टर्मिनसवर परप्रांतीय मजुरांनी गर्दी केली आहे. उत्तर आणि पूर्व भारतात जाणाऱ्या गाड्यांची संख्या वाढवण्यात आल्याची माहिती, रेल्वेच्यावतीनं देण्यात आली आहे.