Manoj Jarange Patil : कराड जामिनावर सुटल्यास महाराष्ट्रात एकही…’त्या’ व्हायरल ऑडिओनंतर जरांगेंचा थेट सरकारलाच इशारा

| Updated on: Dec 10, 2025 | 11:28 AM

वाल्मिक कराड जामिनावर सुटणार असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. कराड सुटल्यास महाराष्ट्रात चाकही फिरणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची आणि त्यांच्या नार्को चाचणीची मागणी जरांगेंनी केली आहे, तसेच एसआयटीच्या स्थापनेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

वाल्मिक कराड जामिनावर सुटणार असल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ज्या दिवशी वाल्मिक कराड सुटतील, त्या दिवशी महाराष्ट्रात एकही चाक फिरू देणार नाही, असा थेट इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्याची मागणी देखील जरांगे पाटील यांनी केली आहे. संतोष देशमुख यांच्या पहिल्या पुण्यस्मरणानिमित्त मस्साजोग येथे जाऊन जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. जरांगे सुपारी प्रकरणात धनंजय मुंडे यांनी एसआयटी चौकशीचे विधान केले होते. त्यावर, ही एसआयटी कधी स्थापन झाली आणि सरकारने आम्हाला याबाबत माहिती का दिली नाही, असे प्रश्नचिन्ह जरांगे पाटील यांनी उपस्थित केले. धनंजय मुंडे यांनी स्वतः नार्को चाचणी करण्याची तयारी दाखवली होती, त्यामुळे त्यांनी आता एसपींकडे अर्ज करावा, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले आहे.

Published on: Dec 10, 2025 11:28 AM