मुंबई: “महाराष्ट्रात आमदारांच्या गाड्यांवर, कार्यालयांवर हल्ले करतात. तुम्ही त्याच्या कुटुंबावर हल्ले करता. मग स्वत:च्या कुटुंबाच रक्षण करण्यासाठी टीम तयार ठेवू नये का? आत्मरक्षण करणं गुन्हा आहे का? आमदाराने मार खायचा का? असा सवाल आमदार संजय गायकवाड यांनी विचारला. “तुम्ही जाहीरपणे भाषणात सांगतात, आमदाराची गाडी फोडली तर मातोश्रीवर स्वागत करु. ही भाषा वापरत असाल, तर आमदाराने तयारीत रहाण चुकीचं आहे का?” असा सवाल संजय गायकडवाड यांनी केला.