
India-Pakistan Conflict : पाकिस्तानकडून युद्धबंदीचं उल्लंघन; आखनूर भागात गोळीबार
पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये सीमेवर तणाव वाढत आहे. पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार केला जात आहे.
पाकिस्तानकडून 7 ते 8 वर्षांनी युद्धबंदीचं उल्लंघन झालं आहे. जम्मू काश्मीरच्या आखनूर भागात गोळीबार झाला आहे. रात्रीच्या सुमारास 10 ते 12 राऊंड फायर झाल्याचा दावा स्थानिकांनी केलेला आहे. गोळीबार झाल्यानंतर आखनूर भागातील नागरिक सध्या अलर्ट मोडवर आहेत. तर आखनूरचे नागरिक भारतीय सैन्यासोबत लढणार असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिक राजू सिंग यांनी दिली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. त्यानंतर सीमेवर सातत्याने पाकिस्तानकडून कुरापातीकरून भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Published on: Apr 30, 2025 2:10 PM
Related Video
शाखा संचलनापासून ते पर्यावरण, संघांच्या प्रांत प्रचारक बैठकीत महत्वाची
Vastu Shastra : रविवारच्या दिवशी चुकूनही करू नका ही कामं
Chanakya Niti : लग्नापूर्वी या चार गोष्टींचा आवश्य विचार करा
चुकूनही लावू नका हे छोटसं फुलझाड, चूक केल्यास घरात जागोजागी दिसतील साप
IMD Weather Update : मोठं संकट, पाऊस पुन्हा धो-धो कोसळणार
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच