कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर आहे. आता पश्चिम रेल्वे देखिल चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडणार आहे. पश्चिम रेल्वेने ब्रांदा ते मडगाव अशी एसी रेल्वे गाडीचं नियोजन केलंय. ७ सष्टेंबरपासून हि विशेष रेल्वे गाडी सोडण्यात येणार आहे. खेड चिपळूण संगमेश्वर रत्नागिरी राजापूर वैभववाडी, कणकवली सिंधुदूर्गनगरी कुडाळ सांवतवाडी असे थांबे या गाडीला असणार आहेत.