राज ठाकरे अयोध्येला जाऊ शकले नाही आणि संभाजीराजे राज्यसभेवर जाऊ शकले नाही. राज ठाकरेंनी सापळा रचल्याचा आरोप केला आणि संभाजीराजेंनी शब्द फिरवल्याचा आरोप केला. या दोन्ही प्रकरणावरुन नेमकं कुणाचं राजकारण आहे यावरुन भाजप-राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. छत्रपतींच्या घरापर्यंत राजकारण कुणी नेलं असा प्रश्न भाजप करतंय. तर संभाजीराजेंना अपक्ष उभं करण्यामागे फडणवीस असू शकतात, असं शाहू महाराज म्हणाले.