Raigad च्या तळीयेतील रेस्क्यू ऑपरेशन अखेर थांबवले, जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा

Raigad च्या तळीयेतील रेस्क्यू ऑपरेशन अखेर थांबवले, जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा

| Edited By: sagar joshi | Updated on: Jul 26, 2021 | 9:43 PM

एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि टीडीआरएफची पथकं गेल्या पाच दिवसापासून रेस्क्यू ऑपरेशन करत होती. आजही या पथकांनी घटनास्थळी येऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. मात्र, त्यानंतर दोन तासाने रेस्क्यू मृतांना श्रद्धांजली अर्पण करुन रेक्स्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं.

गेल्या पाच दिवसांपासून तळीये येथे दरडीचा ढिगारा उपसण्याचं आणि बेपत्ता नागरिकांना शोधण्याचं काम सुरू होतं. त्यासाठी या ठिकाणी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि टीडीआरएफची पथकं गेल्या पाच दिवसापासून रेस्क्यू ऑपरेशन करत होती. आजही या पथकांनी घटनास्थळी येऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. मात्र, त्यानंतर दोन तासाने रेस्क्यू मृतांना श्रद्धांजली अर्पण करुन रेक्स्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं. या पथकांनी रेस्क्यू ऑपरेशन थांबवल्यानंतर स्थानिकांनी त्यांना गराडा घातला. तुम्ही रेस्क्यू ऑपरेशन थांबवा. त्याबद्दल आमचा आक्षेप नाही. मात्र, जे लोक बेपत्ता आहेत. त्यांना मृत घोषित करा, अशी मागणी या नागरिकांनी केली.

Follow Us