राज्यात मुसळधार पाऊस महापुराने थैमान घातलं आहे. रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात दरड कोसळून 100 पेक्षा अधिक लोकांचा जीव गेला. काही भागात महापुराचं सावट आता कमी होत आहे. मात्र, त्याच्या जखमा अजून कायम आहे. अनेक ठिकाणी अद्याप बचावकार्यच सुरु आहे. दुसरीकडे उत्तर भारतात पावसानं हाहा:कार माजवल्याचं चित्र दिसून येतंय. तीर्थक्षेत्र ऋषिकेशमध्ये जनजीवन विस्कळीत झालं. तर जगात चीन आणि जर्मनीमध्ये पावसामुळे लोकांचे मोठे हाल सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.