मुंबई – अंबरनाथमध्ये भररस्त्यात असलेल्या विजेच्या खांबाला रिक्षा धडकल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये रिक्षाचालक जखमी झाला असून, रिक्षाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान यापूर्वी देखील इथे अशाचप्रकारे अनेक अपघात झाल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.