Saamana | काँग्रेसमध्ये बोलघेवड्यांची कमी नाही – सामना
काँग्रेसमध्ये मूळच्या बोलघेवड्यांची कमी नाही, त्यात सिद्धूसारख्या उपऱ्यावर काँग्रेसने फाजील विश्वास टाकायला नको होता, असा सल्ला पंजाब काँग्रेसमधील गोंधळावर आजच्या सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी दिला आहे. सिद्धू यांच्या सततच्या कटकटीमुळे कॅ. अमरिंदर यांना दूर केले गेले. आता सिद्धूही गेले. काँग्रेसच्या हाती काय उरले?, असा सवालही यानिमित्ताने राऊतांनी उपस्थित केला आहे.
काँग्रेसमध्ये मूळच्या बोलघेवड्यांची कमी नाही, त्यात सिद्धूसारख्या उपऱ्यावर काँग्रेसने फाजील विश्वास टाकायला नको होता, असा सल्ला पंजाब काँग्रेसमधील गोंधळावर आजच्या सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी दिला आहे. सिद्धू यांच्या सततच्या कटकटीमुळे कॅ. अमरिंदर यांना दूर केले गेले. आता सिद्धूही गेले. काँग्रेसच्या हाती काय उरले?, असा सवालही यानिमित्ताने राऊतांनी उपस्थित केला आहे.
पंजाबातील गोंधळात भाजपचा हात आहे तसा काँग्रेस नेतृत्वाचाही गोंधळ आहे. काँग्रेस पक्षाला कायमस्वरूपी अध्यक्ष नाही व हंगामी स्वरूपाचे काम सुरू आहे. पंजाबात दलित मुख्यमंत्री करून राहुल गांधी यांनी एक जोरदार पाऊल टाकले ते त्यांच्या प्रिय सिद्धूने अडकवले. काँग्रेस पक्षात मूळच्याच बोलघेवड्यांची कमी नसताना सिद्धूसारख्या उपऱ्या बोलघेवड्यांवर फाजील विश्वास टाकण्याची गरज नव्हती. पंजाबातील गोंधळाचे पडसाद आता इतर राज्यांतही उमटू शकतात.
