राहुल गांधी भारत जोडो यात्रेदरम्यान फक्त टी-शर्ट घालतात. कडाक्याच्या थंडीतही ते कुठल्यावरही उबदार कपड्यांविना चालत आहेत. त्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. विरोधकांकडून टीकाही होतेय. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्रकार परिषदेत त्यावर प्रश्न विचारला असता “वादाचं काय? वाद तर उर्फी जावेदच्या कपड्यांवरूनही सुरुच आहे”, असं संजय राऊत म्हणालेत. दरम्यान, उर्फी जावेदच्या (Urfi Javed) कपड्यांवरून मागच्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.