सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात कृष्णा आणि पंचगंगा नदीला पूर आल्यानं नद्यांचं पाणी काठावरील गावं आणि शहरात शिरलं आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यात 2019 प्रमाणेच पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगलीतील पूरस्थितीची पाहणी केली. भिलवडीमध्ये अजित पवार यांनी बोटीतून पुराने नुकसान झालेल्या भागाचा दौरा केला. त्यावेळी त्यांच्यासोबत मंत्री जयंत पाटील, विजय वडेट्टीवार आणि विश्वजीत कदमही उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी पूरग्रस्तांशीही संवाद साधला.