शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत दिल्लीत गेलेत. पवारांनी गेल्या आठवड्यातच दिल्लीचा दौरा केलाय आणि त्यानंतर राऊत दिल्लीत पोहोचलेत. त्यामुळे मोदी-ठाकरेंच्या दिल्ली भेटीनंतर उठलेलं वादळ शांत होण्याऐवजी आणखी पेटणार असंच दिसतंय. त्यातच संजय राऊतांनी दिल्लीत पोहोचताच महाभारतातल्या लढाईचा दाखला देत राज्यातल्या ठाकरे सरकारची काय स्थिती आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलाय.