शिरूर – उद्योगधंदे खाली गेलेत, रोजगारांच्या संधी कमी झाल्यात,महागाई वाढत आहे. केंद्र सरकार (Central Government )एक एक प्रकल्प बाजारात विकायला लागलाय उत्पादनाच साधनच नाही विकायचं आणि मजा. करायचं ही भूमिका दिल्लीच्या सरकारची आहे. आज दिल्लीत बसलेल्या भाजप(BJP) सरकारने आपल्याला 2014 पासून आश्वासन दिली. त्या भाजपा सरकारला आश्वासन पूर्ण करत आली नाहीत. अशी टीकाही दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी केली आहे. देशाची अर्थव्यवस्था खाली गेली आहे, म्हणून राज्यात तर आपलं सरकार पाहिजे आणि दिल्लीत ही आपल सरकार पाहिजे यासाठी शरद पवार हे देशाचे नवीन राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हणत दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी थेट तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले आहेत.