Hasan Mushrif | लॉकडाऊन करुनही फारसा फायदा नाही, अनलॉकमध्ये खबरदारी घेणे गरजेचे :हसन मुश्रीफ
राज्यात लॉकडाऊन करुनही फारसा फायदा झाला नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाविकासआघाडी सरकारची पंचाईत होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन करुन फायदा झाला नाही. आता अनलॉकमध्ये नागरिकांना खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे मुश्रीफ यांनी म्हटले.