गिरे तो भी टांग उपर! उदय सामंतांची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका

गिरे तो भी टांग उपर! उदय सामंतांची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका

राखी राजपूत | Updated on: Jan 18, 2026 | 10:38 AM

उदय सामंत यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर गिरे तो भी टांग उपर अशी टीका केली आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केल्याने त्यांना सत्ता, नेतृत्व किंवा चर्चा नाही, असे सामंत म्हणाले. भाजप पहिल्या क्रमांकावर असून, शिंदे गट दुसऱ्या, काँग्रेस तिसऱ्या आणि अजित पवार गट चौथ्या स्थानावर असल्याचे त्यांनी नमूद केले.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटावर सडकून टीका केली आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केल्याचा आरोप करत सामंत म्हणाले, “गिरे तो भी टांग उपर अशी ठाकरेंच्या सेनेची अवस्था आहे.” त्यांच्या मते, वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केल्यामुळे त्यांना कुठेही सत्ता, नेतृत्व किंवा चर्चेत स्थान मिळत नाही.

सामंत यांनी राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांच्या स्थितीचेही विश्लेषण केले. त्यांच्या दाव्यानुसार, भारतीय जनता पार्टी पहिल्या क्रमांकावर आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील आणि बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना दुसऱ्या स्थानावर आहे. काँग्रेस पक्ष तिसऱ्या, तर अजित पवार गट चौथ्या स्थानावर आहे. यानंतर कुठेतरी ठाकरे गट पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर येतो, असे सामंत यांनी म्हटले. ठाकरे गटाची संख्या केवळ १२० पर्यंत जाते असे नमूद करत, ही आकडेवारी आपली नसून संपादकांनी छापलेली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Published on: Jan 18, 2026 10:38 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us