राज्यसभेची निवडणुक जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपमध्ये अपक्ष मतदारांना आपल्याकडे घेण्यासाठी चुरस लागली लागली. त्याच अनुशंगाने महाविकास आघाडी सर्व जागा जिंकेल असा विश्वास दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय २०२४ मध्ये उद्धव ठाकरे हेचं मुख्यमंत्री असंही ते म्हणाले आहेत. धनंजय मुंडे यांच्या विधानानंतर वळसे पाटील यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिली आहे. राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून घोडे बाजार होणार अशी चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर सध्या महाराष्ट्रात अपक्ष आमदारांना चांगले दिवस आले आहेत. छोट्या पक्षाचे आमदार आणि अपक्ष आमदार कुणाला मतदान करतात हे १० जूनला स्पष्ट होईल.