Marathi News Videos Varsha Gaikwad left for Delhi directly after winning the Lok Sabha seat in Mumbai

नाराज वर्षा गायकवाड थेट दिल्लीला रवाना, काय घेणार भूमिका?
काही दिवसांपासून वर्षा गायकवाड नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. अशातच आज वर्षा गायकवाड या अचानक थेट दिल्लीला रवाना झाल्या आहेत.
Varsha Gaikwad : मुंबईतील जागांचा तिढा आता दिल्लीत पोहोचला आहे. महाविकास आघाडीत मुंबईतील जागांवरुन तिढा सुरु असतानाच आता वर्षा गायकवाड थेट दिल्लीसाठी रवाना झाल्या आहेत. त्यांच्या अचानक दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वर्षा गायकवाड यांच्यासोबत अमिन पटेल आणि अस्लम शेख हे देखील दिल्लीला रवाना झाले आहेत. काही दिवसांपासून वर्षा गायकवाड नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.मुंबईतील काँग्रेसची उत्तर मुंबईची जागा मिळावी अशी ठाकरे गटाची मागणी आहे. तर ठाकरे गटाची मुंबई दक्षिण मध्यची जागा काँग्रेसला द्यावी अशी मागणी वर्षा गायकवाड यांची आहे.याआधी सांगली आणि भिवंडीचा तिढा होता. पण तो काही दिवसांनंतर सुटला. पण असं असलं तरी अजून काही जागांवरुन ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये तिढा कायम आहे.
Published on: Apr 13, 2024 5:25 PM
Related Video
20 वर्षांनंतरचा निकाल! माफीचा साक्षीदार विश्वासार्ह नाही; सर्व आरोपी..
320KM रेंज आणि सनरूफ, नव्या BaaS मॉडेलमुळे किमतीत मोठी घसरण
राज्यात खळबळ! एकच शिवसेना राहिली... खासदार फुटीनंतर शाहांचे मोठे विधान
ट्विंकल खन्नाला कानशिलात मारणार होता आमिर खान, नेमकं काय घडलेलं?
माफीच्या साक्षीदारामुळे खटल्याचा विचका? कोर्टाचे कडक ताशेरे, गंभीर..
20 वर्षांनंतरचा निकाल! माफीचा साक्षीदार विश्वासार्ह नाही; सर्व आरोपी..
1 रुपया देतात, 100 रुपये काढतात, ठाकरेंकडून लाडकी बहीण योजनेची पोलखोल
निकालाचे वाचन; इंद्रप्रस्थ गेस्ट हाऊसमाध्ये... पवनराजे निंबाळकर प्रकरण
एकच खळबळ! भाजपमध्ये भयंकर घडतंय... नरेंद्र मोदी आहे तोपर्यंतच शांतता..
खासदार फोडणं, आमदार फोडणं... राज्याचा विचका झालाय!; राज ठाकरे भडकले
Buldhana : खाद्य पदार्थासाठीचा मैदा पायाने तुडवला? व्हीडिओ व्हायरल
Nashik : ठाकरेंचे एकनिष्ठ खासदार राजाभाऊ वाजे यांचे सिन्नरमध्ये जंगी स्वागत
जालना - रविकांत तुपकर यांच्यासमर्थनार्थ शेतकरी पुत्रांचे विहिरीत बाज टाकून अनोखे उपोषण..
वर्धा - सेवाग्राम आश्रमातील बापु कुटींच्या भिंतींना संरक्षणासाठी पानोळ्याच्या ताटव्यांचं आच्छादन
चारा उपलब्ध नसल्याने जनावरांच्या खाद्याचा मोठा प्रश्न