नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक अन् सत्यजीत तांबे यांची उमेदवारी यावरून राजकीय वर्तुळात विविध घडामोडी घडल्या. सत्यजीत तांबे यांच्यावर काँग्रेस पक्षाने केलेली कारवाईवर काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सत्यजीत तांबेंवर कारवाई नेमकी कशामुळे झाली हे अवघा महाराष्ट्र जाणतो. सत्यजीत माझे मित्र आहेत. पण काँग्रेस पक्षाने जी भूमिका घेतली ती घडलेल्या प्रसंगानुरुप घेतली. यावर मला अधिकची टिपण्णी करायची नाहीये”, असं विश्वजीत कदम म्हणालेत.