पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी धडाकाच लावलाय, मदरशांबाबत घेतला सर्वात मोठा निर्णय, आतापासून…

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी धडाकाच लावलाय, मदरशांबाबत घेतला सर्वात मोठा निर्णय, आतापासून…

| Updated on: May 21, 2026 | 11:41 AM

पश्चिम बंगालमध्ये सत्तांतरानंतर मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या सरकारने दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्य सरकारने आता शाळांप्रमाणेच सर्व मदरशांमध्ये प्रार्थनेच्या वेळी ‘वंदे मातरम्’ म्हणणे अनिवार्य केले आहे. सरकारी तसेच अनुदानित मदरशांना हा नियम लागू करण्यात आला असून याबाबत अधिकृत आदेशही जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

पश्चिम बंगालमध्ये सत्तांतरानंतर मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या सरकारने दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्य सरकारने आता शाळांप्रमाणेच सर्व मदरशांमध्ये प्रार्थनेच्या वेळी ‘वंदे मातरम्’ म्हणणे अनिवार्य केले आहे. सरकारी तसेच अनुदानित मदरशांना हा नियम लागू करण्यात आला असून याबाबत अधिकृत आदेशही जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

यासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही नवा नियम लागू करण्यात आला आहे. आता कोणताही सरकारी कर्मचारी परवानगीशिवाय माध्यमांशी बोलू शकणार नाही. तसेच वर्तमानपत्र, टीव्ही चॅनल किंवा सोशल मीडियावर सरकारच्या धोरणांवर टीका करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. या नियमात सरकारी शाळा आणि महाविद्यालयांतील शिक्षकांचाही समावेश आहे. दरम्यान, मदरशांना दिला जाणारा भत्ता बंद करण्याचीही चर्चा रंगू लागली आहे. अता या भत्त्याबाबात पश्चिम बंगालचं सरकार काय निर्णय घेईल? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लगलं आहे.

Published on: May 21, 2026 11:41 AM
Follow Us