भारतीय जनता पक्षाकडून महाविकास आघाडीच्या दोन मतांवर आक्षेप घेण्यात आला. भाजपकडून महाविकास आघाडीच्या दोन मतांवर आक्षेप, मात्र हे मतदान ग्राह्य धरण्यात आलं. भारतीय जनता पक्षाचा आक्षेप फेटाळण्यात आला. जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांच्या मतांवर आक्षेप घेण्यात आला. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची मतपत्रिका जयंत पाटील तर यशोमती ठाकूर यांनी त्यांची मतपत्रिका नाना पटोले यांच्या हाती सोपवली. त्यावर भाजपाने आक्षेप घेतला. ही मतदानाची पद्धत नाही. त्यामुळे त्यांचे मत बाद व्हावे, अशी तक्रार पराग अळवणी यांनी केली. निवडणूक अधिकाऱ्यांकडे त्यांनी यासंबंधी तक्रार करून महाविकास आघाडीची ही दोन मते बाद करण्याची विनंती केली आहे. ही दोन मते बाद झाल्यास महाविकास आघाडी अडचणीत येवू शकते.