Maharashtra Election News LIVE : एमआयएमच्या नगरसेविकेला आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजीने प्रत्युत्तर
Live Updates in Marathi : नगर परिषद आणि महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. राज्यभरात एकनाथ शिंदे यांच्या 30 हून अधिक सभा होणार आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा परिषद निवडणुकीत सभांचा धडाका असणार आहे. राज्यभरात एकनाथ शिंदे यांच्या तीसहून अधिक सभा आणि रोड शो होणार आहेत. नगर परिषद आणि महापालिका निवडणुकांपाठोपाठ आता जिल्हा परिषद निवडणुकीतही शिवसेनेचं मायक्रो प्लॅनिंग सुरू आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी शिवसेनेची प्रचार रणनिती ॲक्टिव्ह झाली आहे. शिवसेनेच्या प्रचार रणनितीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या सर्वाधिक सभा होणार आहेत. तर दुसरीकडे नाशिकच्या तपोवन वृक्षतोडप्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. वकील नितीन पंडित यांनी तपोवनातील वृक्षतोडी प्रकरणी याचिका दाखल केली होती. वृक्षतोड प्रकरणी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रशेखर आणि गौतम अखंड यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. राज्य सरकार आणि नाशिक महापालिकेला न्यायालयात हजर राहण्यासाठी मागच्या तारखेला नोटीस बजावण्यात आली होती. यासोबतच इतर अपडेट्स, राज्याभरातील घडामोडी, राष्ट्रीय पातळीवरील बातम्या जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा..
LIVE NEWS & UPDATES
-
परभणीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव, उमेदवार ढसढास रडला
परभणीच्या ताडकळस जिल्हा परिषद गटात अपक्ष उमेदवार असलेल्या डॉ. भारत नांदूरे यांच्यावर उमेदवारी अर्ज माघे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला जातोय. पक्षातील लोक माझ्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप त्यांनी एका व्हिडीओ मधून केला आहे. हे सगळं सांगत असताना ते रडल्याचे दिसत आहे.
-
एमआयएमच्या नगरसेविकेला आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजीने प्रत्युत्तर
मुंब्रात राष्ट्रवादी शरद पवार गटाने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. ‘जश्न-ए-जित’ रॅलीनंतर जितेंद्र आव्हाडांची दर्गा गल्लीत जाहीर सभा झाली. या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली. MIM नगरसेविका सहर युनिस शेख यांच्या “मुंब्रा को ग्रीन बनाना है” वक्तव्यावर बॅनरबाजीद्वारे प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
-
-
पंढरपूरमध्ये 8 जिल्हा परिषद गटांसाठी अर्ज केलेल्या 67 उमेदवारांची माघार
पंढरपूर तालुक्यामध्ये 8 जिल्हा परिषद गटांसाठी अर्ज केलेल्या 67 उमेदवारांनी माघार घेतली आहे तर पंचायत समितीसाठी 124 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आठ जागांसाठी 47 उमेदवार रिंगणात आहेत, तर पंचायत समितीच्या 16 गणांसाठी 70 उमेदवार निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. पंढरपूर मध्ये भाजपा विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी असा सामना आहे. यामध्ये बहुचर्चित गोपाळपूर जिल्हा परिषद गटात पाच उमेदवार असलेले दिसून येत आहेत….
-
अहिल्यानगर महापालिकेच्या महापौरपदाची निवड 6 फेब्रुवारी रोजी
नवनिर्वाचित सदस्यांमधून अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी गुरुवार म्हणजेच 6 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता महापालिका सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात येणार आहे..ही निवड प्रक्रिया नाशिक, धुळे, जळगावसह राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये एकाच दिवशी पार पडणार आहे..या विशेष सभेसाठी विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची पीठासीन अधिकारी
-
स्त्रियांच्या सन्मानावर आघात करणारी भाषा कदापी मान्य नाही – माजी मंत्री नितीन राऊत
भंडारा जिल्ह्यातील शहापूर येथे झालेल्या भीम मेळाव्यात अंजली भारती यांनी अमृता फडणवीस यांच्यावर केलेली खालच्या पातळीची वैयक्तिक टीका अत्यंत निषेधार्ह आहे.परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर स्त्रियांचा सन्मान, स्वाभिमान आणि समानतेचा पुरस्कार केला.बाबासाहेबांच्या विचारांच्या नावाखाली कोणत्याही स्त्रीवर वैयक्तिक टीकाटिप्पणी करणे हे त्यांच्या मूल्यांना धरून नाही.राजकीय मतभेद असू शकतात, पण स्त्रियांच्या सन्मानावर आघात करणारी भाषा आम्ही कधीही स्वीकारणार नाही.अशा प्रवृत्तीचा आम्ही स्पष्ट शब्दांत निषेध करतो असे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी म्हटले आहे.
-
-
अंजली भारती यांचा कार्यक्रम होऊ देणार नाही – नागपूर भाजपा महिला आघाडी
अमृता फडणवीस यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अंजली भारती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नागपूर भाजप महिला आघाडीतर्फे पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.नागपुरात 1 तारखेला होणारा अंजली भारती यांचा कार्यक्रम होऊ देणार नाही, तो उधळून लावण्याचा इशारा सुद्धा भाजपा महिला आघाडीने दिला आहे.
-
एमआयएमने डिवचल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचे मुंब्रा येथे भव्य स्वागत
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मुंब्रा भागात सत्कार करण्यात येत आहे. 12 उमेदवार निवडून आल्यानंतर सत्कार रॅली काढण्यात येत आहे. एमआयएमचे 5 उमेदवार निवडून आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांना नगरसेविका सहर शेख यांनी डिवचले होते.एमआयएमला प्रति उत्तर देण्यासाठी मुंब्रा भागात जितेंद्र आव्हाड सभा घेणार आहेत.
-
गायिका अंजली भारती यांच्या विरोधात मीरा-भाईंदरमध्ये तक्रार
अमृता फडणवीस यांचा अवमान केल्याप्रकरणी गायिका अंजली भारती यांच्या विरोधात मीरा-भाईंदरमध्ये भाजप महिला आघाडी आक्रमक झाली असून तिने तक्रार दाखल केली आहे.
-
शशी थरूर काँग्रेस संसदीय रणनीती गटाच्या बैठकीला गैरहजर
अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भात काँग्रेस संसदीय रणनीती गटाची बैठक सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ येथील निवासस्थानी झाली. शशी थरूर या बैठकीला उपस्थित नव्हते.
-
बोरिवली नॅशनल पार्कमध्ये आदिवासी आणि वनविभागात राडा
बोरिवलीच्या नॅशनर पार्कमध्ये आदिवासी आणि वनविभागात राडा झाल्याचं पाहायला मिळालं. वनविभागाने आदिवासींची बेकायदेशीर बांधकामं पाडली. त्यानंतर स्थानिक आदिवासी रहिवाशांकडून कर्मचाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली. न्यायालयाच आदेश आणि स्थानिकांना विश्वासात घेऊन निर्णय करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
-
एकनाथ शिंदेंनी गणेश नाईक, दानवेंवर बोलणं टाळलं
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेश नाईक यांच्या प्रश्नावर बोलणं टाळलं. बालेकिल्ला कोणाचाहीअसो, भाजपाने परवानगी दिली तर नामोनिशान मिटवून टाकू असं आव्हान गणेश नाईक यांनी दिलं होतं. हाच प्रश्न पुन्हा एकदा गणेश नाईक यांना विचारला असताना त्याने राहू दे रे बाबा असं बोलून प्रतिक्रिया टाळली.
-
ममता बॅनर्जी दिल्लीत निवडणूक आयोगासमोर धरणे आंदोलन करतील
ममता बॅनर्जी उद्या दिल्लीत येणार आहेत. पोहोचल्यानंतर, त्या पुढील एक-दोन दिवसांत निवडणूक आयोगासमोर धरणे आंदोलन करतील. दुपारी 4 वाजता विमान पकडतील. ममता बॅनर्जी उद्या दुपारी 12 वाजता ऐतिहासिक सिंगूर रॅली घेतील.
-
किसान सभेतील नेत्यांशी सकारात्मक चर्चा- महाजन
किसान सभेतील नेत्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. आदिवासी बांधवांच्या सर्व मागण्या ऐकून घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. लाँग मार्चमधील आदिवासी बांधवांच्या सर्व मागण्या ऐकून घेतल्या. आदिवासी बांधवांच्या मागणीबाबत मुख्यमंत्रीही सकारात्मक आहेत.
-
सांगली : माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या मुलाची निवडणुकीतून माघार
सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी एक मोठी घडामोडी घडली. तासगाव तालुक्यातील चिंचणी जिल्हा परिषद गटातून माजी खासदार व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते संजयकाका पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील यांनी माघार घेतली आहे. या ठिकाणी प्रभाकर पाटील यांच्या विरोधात त्यांच्याच भावकीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अक्षय पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. भावकीत वाद निर्माण होऊ नये म्हणून माघार घेतली असल्याचे समोर आले आहे.
-
जळगाव : सोने आणि चांदीच्या दरात घसरण
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात 700 रुपयांची तर चांदीच्या दरात 5 हजार रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह प्रतितोळा 1 लाख 64 हजार 79 हजार रुपयांवर तर चांदीचे दर प्रतिकिलो 3 लाख 55 हजार 350 रुपयांवर पोहोचले आहेत.
-
धाराशिव : मुरूम नगरपरिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर शाईफेक
मुरूम नगरपरिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर आंबेडकरी तरुणांनी शाईफेक केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा न ठेवल्याने भीम सैनिक आक्रमक झाले होते. यानंतर मुरूम नगर पालिका मुख्य अधिकाऱ्याला आंबेडकरी तरुणांनी जाब विचारत घेराव घातला आणि आंदोलन केले.
-
पालघर : सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना अटक
पालघर जिल्ह्यात बोईसर पोलिसांनी मोठी कामगिरी करत सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना अटक केली आहे. आरोपींकडून तब्बल 45.30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. गॅस एजन्सी कर्मचारी असल्याचा बनाव करून घरात प्रवेश करून चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पुढील तपास बोईसर पोलीस करत आहेत.
-
परांड्यात तानाजी सावंत यांना पुन्हा एकदा धक्का
परांड्यात तानाजी सावंत यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांची बंडखोरी कायम आहे. परंडा विधानसभा मतदारसंघात धनंजय सावंतांचा गट भाजपासोबत लढणार आहे. स्वतः धनंजय सावंत निजाम जवळा गटातून जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजप शिवसेना एकत्र असताना तानाजी सावंत यांच्या परांडा मतदारसंघात शिवसेना भाजप वेगळे लढणार आहेत.
-
समता दलाकडून मंत्री गिरीश महाजनांविरोधात घोषणाबाजी आणि निदर्शने
जळगावात भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात समता दलाकडून जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली आहेत. मंत्री गिरीश महाजन मुर्दाबाद, अशी घोषणबाजी करत यावेळी समता दलाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात नाशिक येथे मंत्री गिरीश महाजन यांनी भाषणात बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर माफी मागावी,अन्यथा त्यांना जळगावमध्ये फिरू देणार नाही, असा इशारा देण्यात आला.
-
मालेगावात नायट्रोजन गॅस सिलेंडरच्या स्फोट प्रकरणात दोघांना अटक
मालेगावात नायट्रोजन गॅस सिलेंडरच्या स्फोट प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी प्रजासत्ताक दिनी फुगे फुगवत असताना ही स्फोटाची घटना घडली. या स्फोटात फुगे घेण्यासाठी थांबलेले 5 जण गंभीर जखमी झाले होते. स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी फुगे विक्रेत्यांना अटक करण्यात आली. पोलीस या प्रकरणात पुढील तपास करत आहेत. सिलेंडर स्फोटानंतर शहरात फुगे विक्रेत्यांची कसून तपासणी सुरू आहे.
-
भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांची उमेदवारी कायम
भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांची उमेदवारी कायम आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीतून माघार घेण्याची चर्चा निष्फळ ठरली आहे. अर्चना पाटील जिल्हा परिषदेच्या तेर गटातून भाजपकडून निवडणूक रिंगणात उभ्या आहेत. अर्चना पाटील लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. अर्चना पाटील या भाजपकडून जिल्हापरिषद अध्यक्ष पदासाठी प्रमुख दावेदार आहेत.
-
जालन्यात भाजप गटनेतेपदी महेश निकम यांची निवड, प्रतोद म्हणून रमेश गोरक्षक यांना संधी
जालना महापालिकेच्या निकालानंतर 11 व्या दिवशी भाजपला गटनेता मिळाला आहे. जालन्यात भाजप गटनेतेपदी महेश निकम यांची निवड करण्यात आली आहे. तर प्रतोद म्हणून रमेश गोरक्षक यांना संधी देण्यात आली आहे. जालन्याचा 30 तारखेला पाहिला महापौर ठरणार आहे. भाजपने जालना शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये 41 जागा जिंकल्या आहेत.
-
स्त्री कोणतीही असू दे तिचा आदर केला पाहिजे- ज्योती वाघमारे यांची टीका
अमृता फडणवीसांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर शिवसेना शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे यांची टीका. स्त्री कोणतीही असू दे तिचा आदर राखला गेला पाहिजे, अंजली भारती यांच्या विधानाचा जाहीर निषेध असे ज्योती वाघमारे यांनी म्हटले आहे.
-
नगरपंचायतीत रोज 2 तास मोबाईल टीव्ही न पाहण्याचा निर्णय
सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीत रोज 2 तास मोबाईल टीव्ही न पाहण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अनगरमध्ये रोज सायंकाळी 7 ते 9 पर्यंत मोबाईल आणि टीव्ही न पाहण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांचे आरोग्य आणि भविष्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलाय असे नगराध्यक्षा प्राजक्ता पाटील असे म्हटले आहे.
-
देवेंद्र फडणवीस यांची एकनाथ शिंदेसोबत फोनवर चर्चा
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवर चर्चा केली आहे. दोन दिवसांनी भाजप शिवसेनेचे सर्व नगरसेवक एकत्र कोंकण भवनला जाणार आहेत. दोन्ही पक्षाचे नगरसेवक एकत्र नोंदणी करणार आहेत. भाजप शिवसेनेचे कोंकण भवनात होणार शक्ती प्रदर्शन.
-
बीड पंचायत समिती कार्यालयावर हल्ला
बीडच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये आज दुपारी बीड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय गुंदेकर यांच्यावर हल्ला झाला. हा हल्ला बीड तालुक्यातील मौज गावचा सरपंच संदिप डावखर याने केला. हल्ला केल्यानंतर अश्लील शिवीगाळ करत दगडाने देखील मारहाण केली. माझ्या गावातील लोकांची कामे तू का करतो? असा जाब विचारत हा प्राणघातक हल्ला करण्यात आला. हा हल्ला मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
-
गिरीश महाजन यांच्याविरोधात परभणीत निदर्शने
परभणी मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. आंबेडकरी अनुयायी यांच्या वतीने डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर आंदोलन करण्यात आले. गिरीश महाजन यांचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात आली. अॅट्रोसिटीनुसार महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. आशिष वाकोडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
-
२ अल्पवयीन मुलींना माथेफिरूने विहिरीत ढकलले
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साकरी येथे शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना एका माथेफिरू तरुणाने थेट विहिरीत ढकलल्याची धक्कादाय घटना समोर आली असून दोन्ही मुली नेहमीप्रमाणे शिकवणीसाठी जात असताना संशयित माथेफिरू तरुणाने अचानक दोन्ही मुलींना शेतातील विहिरीत ढकलल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मुलींना विहिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. घटनेचे नेमके कारण हे अद्याप स्पष्ट झालेले नसून याप्रकरणी नाही पोलिसांनी गावातीलच एकला या संशयित माथेफिरू तरुणास ताब्यात घेतले
-
पाडकाम कारवाईने आदिवासींची तब्येत बिघडली
बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अनेक आदिवासींची तब्येत बिघडली. तोडफोडीची कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलिस दल आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाहून तब्येत बिघडली. हायकोर्टाच्या आदेशानंतर आदिवासी आणि प्रशासनात संघर्ष उडाला आहे.
-
प्रमोद पुंडलिक रावराणे बिनविरोध
वैभववाडी येथे भाजपने ठाकरे सेनेला जोरदार धक्का दिला. प्रमोद पुंडलिक रावराणे बिनविरोध निवडून आले. वैभववाडी तालुक्यातील कोळपे जि.प.मतदारसंघात बिनविरोध निवड झाली. आतापर्यंत सहा जिल्हा परिषद बिनविरोध झाल्या.
-
चांदवड येथे सकल हिंदू समाज आक्रमक
चांदवड येथे सकल हिंदू समाज आक्रमक झाला आहे. समाजकंटकाने शहरातील एका मंदिरात विटंबना केली. विटंबनेच्या निषेधार्थ चांदवड शहर बंदची सकल हिंदू समाजाकडून हाक देण्यात आली आहे. व्यापारी वर्गाकडून कडकडीत बंद पाळत उस्फुर्त प्रतिसाद दिला. हजारोच्या संख्येने चांदवड शहरातील प्रमुख मार्गावरून विटंबना झालेल्या मंदिरापर्यंत मोर्चा काढून निषेध केला. या मोर्चा दरम्यान धार्मिक घोषणांचा जयघोष करण्यात आला.
-
ठाण्यात मनसेचा बिहार भवनाला विरोध
ठाण्यात मनसेचा बिहार भवनाला विरोध आहे. याविषयी सरकारला डिवचणारे बॅनर मनसे पदाधिकारी स्वप्निल महिंद्रकर यांनी लावले आहेत. ठाण्यातील नितीन कंपनी या ठिकाणी झाला मोठा बॅनर मनसेच्या वतीने लावण्यात आला आहे. फलकामध्ये बिहार भवन, सरकारची भूमिका आणि सामान्यावरील अन्याय या मुद्द्यावर मनसेचे ठाम भूमिका दाखवण्यात आले आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये बिहार भवन विषय गाजत आहे.
-
गिरीश महाजनांविरोधात तीव्र आंदोलन
सोलापुरात मंत्री गिरीश महाजनांच्या विरोधात डीपीआय संघटनेने निदर्शने केली. गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख टाळल्याने भीम अनुयायी आक्रमक झाले आहेत. डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने गिरीश महाजन यांच्या विरोधात निदर्शने सुरू केली आहेत. गिरीश महाजन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करणार आहेत.
-
छत्रपती संभाजीनगर मध्ये महाविकास आघाडीचे मूक धरणे आंदोलन
अहिल्यादेवी होळकर निर्मित ऐतिहासिक मनकर्णिका घाटाची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ तोंडाला काळे मास्क लावून आंदोलन सुरू आहे. भाजप सरकारच्या विरोधात आंदोलनाच्या माध्यमातून महाविकास आघाडी एकत्र आली आहे. आंदोलनाला ठाकरे शिवसेनेचे अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित आहेत.
-
अखेर अकोला महानगरपालिकेवर सत्ता स्थापनाचा तिढा सुटला…
अखेर अकोला महानगरपालिकेवर सत्ता स्थापनाचा तिढा सुटला आहे. भाजपच्या नेतृत्वात शहर सुधार आघाडी सत्ता स्थापना करणार आहे. सत्ता स्थापनेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा अकोल्यात भाजपाला पाठिंबा असणार आहे.
-
नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांचा आज एक दिवसाचा बँक बंद संप….
पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या मागणीसाठी बँक कर्मचाऱ्यांकडूव आक्रोश करण्यात आला. जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा यांसह सर्वच राष्ट्रीयकृत बँकांनी संप पुकारला. या संपामुळे रोख व्यवहार ठप्प होणार नाही यासाठी एटीएम आणि यूपीआय सेवा सुरळीत करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा बँक कर्मचाऱ्यांचा आरोप आहे.
-
ठाण्यात मनसेचा बिहार भवनाला विरोध…
ठाण्यात मनसेने बिहार भवनाला विरोध केला आहे. मनसे पदाधिकारी स्वप्निल महिंद्रकर यांनी सरकारला डीवचणारे बॅनर लावले आहेत. ठाण्यातील नितीन कंपनी या ठिकाणी मनसेच्या वतीने मोठा बॅनर लावण्यात आला आहे… फलकामध्ये बिहार भवन,सरकारची भूमिका आणि सामान्यावरील अन्याय या मुद्द्यावर मनसेचे ठाम भूमिका दाखवण्यात आले आहे.. सध्या महाराष्ट्रामध्ये बिहार भवन विषय गाजत आहे…
-
ठाण्यात मनसेचा बिहार भवनाला विरोध…
ठाण्यात मनसेचा बिहार भवनाला विरोध आहे. मनसे पदाधिकारी स्वप्निल महिंद्रकर यांनी सरकारला डिवचणारे बॅनर लावले आहेत. ठाण्यातील नितीन कंपनी या ठिकाणी मोठा बॅनर मनसेच्या वतीने लावण्यात आला आहे. या फलकामध्ये बिहार भवन,सरकारची भूमिका आणि सामान्यावरील अन्याय या मुद्द्यावर मनसेचे ठाम भूमिका दाखवण्यात आली आहे.
-
पुणे – वाघोलीत आईनेच केली मुलाची हत्या
पुण्यातील वाघोलीत आईनेच 11 वर्षांच्या मुलाची हत्या केली. तर 13 वर्षांच्या मुलीवर आईनेच प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर झाले आहे.
-
नंदुरबार – राष्ट्रीयकृत बँकांचा आज एक दिवसाचा संप
नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांचा आज एक दिवसाचा बँक बंद संप आहे. 5 पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या मागणीसाठी बँक कर्मचाऱ्यांचा आक्रोश. जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा यांसह सर्वच राष्ट्रीयकृत बँकांचा संप आहे. या संपामुळे रोख व्यवहार ठप्प होऊ नयेत, यासाठी एटीएम आणि यूपीआय सेवा सुरळीत करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा बँक कर्मचाऱ्यांचा आरोप असून मागण्या मान्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
-
छत्रपती संभाजीनगर मध्ये महाविकास आघाडीचे मूक धरणे आंदोलन
छत्रपती संभाजीनगर मध्ये महाविकास आघाडीचे मूक धरणे आंदोलन. अहिल्यादेवी होळकर निर्मित ऐतिहासिक मनकर्णिका घाटाची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ तोंडाला काळे मास्क लावून आंदोलन सुरू आहे. भाजप सरकारच्या विरोधात आंदोलनाच्या माध्यमातून महाविकास आघाडी एकत्र आली आहे. या आंदोलनाला ठाकरे शिवसेनेचे अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित आहेत.
-
जालन्यात खाजगी ट्रॅव्हल्सला अचानक भीषण आग, ट्रॅव्हल्स जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही
जालन्यात खाजगी ट्रॅव्हल्सला अचानक भीषण आग लागली . आगीमध्ये खाजगी ट्रॅव्हल्स जळून खाक झाली. पहाटे 3 च्या सुमारास छत्रपती संभाजीनगर जालना रोडवर शेलगाव गावाजवळ ही घटना घडली . टायरचे घर्षण झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती. अग्निशामक दलाने दीड तासाच्या अथक परिसरामानंतर आग आटोक्यात आणली . सुदैवाने सर्व प्रवासी वाचले, कोणतीही जीवितहानी झाली नाही.
-
केडीएमसीच्या महापौर पदाचा पेच कायम, वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेकडे लक्ष
केडीएमसीच्या गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होत असली, तरी सर्वांचे लक्ष महापौर पदाच्या खुर्चीकडे लागले आहे. याबाबत बोलताना गटनेते शशिकांत कांबळे आणि जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी स्पष्ट केले की, महापौर आणि इतर महत्त्वाच्या पदांबाबतचा अंतिम निर्णय भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते यांच्यातील चर्चेनंतरच होईल. दोन्ही पक्षांचे नेते लवकरच एकत्र बसून सत्तेचा अंतिम फॉर्म्युला ठरवणार असून, त्यानंतरच महापालिकेतील नव्या कारभाऱ्याचे नाव स्पष्ट होणार आहे.
-
केडीएमसीत भाजपचे ५० नगरसेवक गट नोंदणीसाठी रवाना; शशिकांत कांबळे नवे गटनेते
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सत्ता स्थापनेच्या हालचालींनी आता वेग आला आहे. भाजपचे ५० नवनिर्वाचित नगरसेवक आज अधिकृत गट नोंदणीसाठी कोकण भवनाकडे रवाना झाले आहेत. डोंबिवलीतील जिमखाना परिसरातून हे सर्व नगरसेवक एकत्रितपणे नवी मुंबईकडे निघाले. यावेळी भाजपच्या गटनेते पदी शशिकांत कांबळे यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी केली. महापालिकेत आपला स्वतंत्र गट नोंदवून सत्तेच्या वाटाघाटीत आपले पारडे जड ठेवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे.
-
नंदुरबारला अवकाळीचा तडाखा, आंब्याचा मोहर गळाल्याने बागायतदार संकटात
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणानंतर काल रात्री झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सातपुड्याच्या डोंगराळ पट्ट्यात पावसाच्या सरी कोसळल्याने आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. काही दिवसांपूर्वीच आंब्याच्या झाडांना आलेला बहर या पावसामुळे जमिनीवर गळून पडला असून, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंब्यासोबतच रब्बी हंगामातील मुख्य पीक असलेला गहू, पपई आणि इतर नगदी पिकांचेही या अवकाळीमुळे नुकसान झाले आहे. गेल्या महिनाभरापासून सातत्याने हवामानात बदल होत असल्याने शेतीकामांचे नियोजन कोलमडले आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती असतानाच, या पावसाने उभ्या पिकांचे नुकसान केल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.
-
ठाणे महापालिकेत भाजपची मोर्चेबांधणी, मुकेश मोकाशी गटनेते पदी
ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींनी वेग घेतला आहे. भाजपच्या सर्व २८ नवनिर्वाचित नगरसेवकांचा अधिकृत गट स्थापन करण्यासाठी आज हे सर्व लोकप्रतिनिधी नवी मुंबईतील कोकण भवन येथे जाणार आहेत. भाजपच्या गटनेते पदी माजी उपमहापौर मुकेश मोकाशी यांची निवड करण्यात आली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली ही नोंदणी प्रक्रिया पार पडणार आहे. या महत्त्वपूर्ण प्रवासाची सुरुवात करण्यापूर्वी सर्व नगरसेवकांनी माघी गणपतीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. या प्रसंगी भाजप ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले, आमदार निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर हे देखील उपस्थित राहणार आहेत. कोकण भवनात गट नोंदणी झाल्यानंतर ठाणे महापालिकेतील भाजपची भूमिका अधिक स्पष्ट होणार आहे.
-
नाशिक मनपावर भाजपचे वर्चस्व, गटनेते पदी शाम बडोदे यांची नियुक्ती
नाशिक महानगरपालिका निवडणुकीत ७२ जागा जिंकून भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत एकहाती सत्ता काबीज केली आहे. या विजयानंतर आता प्रशासकीय प्रक्रियेला वेग आला आहे. भाजपच्या गटनेते पदी ज्येष्ठ नेते शाम बडोदे यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. गटनेते पदाची माळ बडोदे यांच्या गळ्यात पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष नाशिकच्या महापौर पदाकडे लागले आहे. विशेष म्हणजे, यावेळचे महापौर पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने भाजपमधील अनेक दिग्गज महिला नगरसेविकांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. हिमगौरी आडके-आहेर, स्वाती भामरे यांसारखी नावे आघाडीवर असून, लवकरच पक्षश्रेष्ठींकडून अंतिम नाव जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.
-
लाल वादळ कसारा घाटात, ३ दिवसांत १०० किमीचे अंतर पार, लवकरच ठाण्यात प्रवेश
नाशिकहून निघालेले लाल वादळ आता इगतपुरीत विसावल्यानंतर जुन्या कसारा घाट मार्गे ठाणे जिल्ह्याच्या दिशेने रवाना झाले आहे. गेल्या तीन दिवसांत कडाक्याच्या उन्हात आणि खडतर प्रवासात या आंदोलकांनी १०० किलोमीटरचे अंतर कापले आहे. विशेष म्हणजे, आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार न घेण्याच्या निर्धाराने निघालेल्या या शेतकऱ्यांकडे पुढील १०० दिवस पुरेल इतकी रेशनची व्यवस्था सोबत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आंदोलक पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली आणि आंदोलन थांबवण्याची विनंती केली, मात्र एककीडे चर्चा सुरू राहील आणि दुसरीकडे आमचा लढा सुरूच राहील, असे सांगत आंदोलक आपल्या निर्णयावर ठाम आहेत.
-
नंदुरबार जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा
नंदुरबार जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. शहादा शहरासह परिसरात अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली, तर जिल्ह्याच्या अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. या अवकाळी पावसामुळे बळीराजा अडचणीत सापडला असून, रब्बी हंगामातील पिकांचे गणित बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
-
अमरावती महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पुढे ढकलली
अमरावती महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पुढे ढकलली. 30 जानेवारी ऐवजी आता 6 फेब्रुवारी रोजी होणार महापौर पदाची निवड. अमरावती महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी 30 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आल्याचा पत्र विभागीय आयुक्तांनी काढले होते. पण आज नवीन पत्र काढून ही निवडणूक आता 6 फेब्रुवारी रोजी आयोजीत करण्यात आली आहे.
-
सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीचा स्तुत्य उपक्रम
सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीचा स्तुत्य उपक्रम. अनगरच्या नूतन नगराध्यक्षा प्राजक्ता पाटील यांनी रोज संध्याकाळी 7 ते 9 यावेळेत गावकऱ्यांनी मोबाईल न वापरण्याचा, टीव्ही न पाहण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांच्या आरोग्य आणि भविष्यासाठी घेण्यात आला निर्णय. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या नगराध्यक्षांच्या नूतन संकल्पनेचे ग्रामस्थांकडून स्वागत.
-
धाराशिव जिल्हा परिषद जागा वाटपावरून शिवसेना–भाजपमधील तणावावर तोडगा
धाराशिव जिल्हा परिषद जागा वाटपावरून शिवसेना–भाजपमधील तणावावर तोडगा निघाला आहे. जिल्हा परिषदेच्या 23 जागा तर पंचायत समितीच्या 50 जागा शिवसेना लढवणार असल्याची माहिती सरनाईकांनी दिली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये निर्माण झालेल्या तणावानंतर अखेर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली.
भाजपाचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील, पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि शिवसेनेचे संपर्कप्रमुख राजन साळवी यांच्यामध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये दोन्ही पक्षांसाठी समतोल राखण्याचा निर्णय घेण्यात आला.
-
ठाण्यातील घोडबंदर रोडसह इतर काही ठिकाणी पावसाची हजेरी
ठाण्यातील घोडबंदर रोडसह इतर काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात बदल झाला आहे. हवामान खात्याने विविध भागात पाऊस पडण्याचा इशारा दिला होता.
-
नाशिकमधील तपोवन वृक्षतोड प्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी
नाशिकमधील तपोवन वृक्षतोड प्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी आहे. वकील नितीन पंडित यांनी तपोवनातील वृक्षतोडी प्रकरणी याचिका दाखल केली होती. वृक्षतोड प्रकरणी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रशेखर आणि गौतम अखंड यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.
-
डोंबिवलीत अन्न व औषध प्रशासन आणि मानपाडा पोलिसांची मोठी कारवाई
डोंबिवलीत अन्न आणि औषध प्रशासन आणि मानपाडा पोलिसांनी मोठी कारवाई केली. डोंबिवलीतील सोनारपाडा परिसरात छापा टाकून मानवी आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या बनावट औषधांचा मोठ्या प्रमाणात साठा जप्त केला ‘टेल्मा एम’ नावाच्या औषधांची बनावट कंपनी उभारून डोंबिवलीसह महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये विक्री सुरू होती.
सिक्कीममधील गंगटोक येथील मूळ कंपनीच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाने तपास करत ठाण्यातील वागळे इस्टेट आणि डोंबिवलीतील सोनारपाडा परिसरात छापा टाकून मोठ्या प्रमाणात बनावट औषधांचा साठा जप्त केला. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी मानवी आरोग्यास धोका निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करत पाच आरोपींना बेड्या ठोकत तपास सुरू केला.
-
नाशिक शहरात ‘हिट अँड रन’ चा थरार; घटना सीसीटीव्हीत कैद
नाशिक शहरात ‘हिट अँड रन’चा थरार पहायला मिळाला. भरधाव चारचाकीची दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक लागली. या घटनेत दुचाकीवरील दोघंजण गंभीर जखमी झाले. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील ही घटना आहे. घटनेनंतर CCTV व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Published On - Jan 27,2026 8:28 AM
