AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmer Loan Waiver: निवडणूक आयोगाची ती अट… कर्जमाफीच्या घोषणेवर संकट? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य काय?

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme: 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत थकीत शेतकरी पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. त्यासाठीची सर्व तयारी झाली आहे. पण कर्जमाफीची घोषणा मात्र सरकारला सध्या करता येणार नाही. काय आहे याविषयीची मोठी अपडेट?

Farmer Loan Waiver: निवडणूक आयोगाची ती अट... कर्जमाफीच्या घोषणेवर संकट? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य काय?
शेतकरी कर्जमाफी योजना , देवेंद्र फडणवीसImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jun 02, 2026 | 1:56 PM
Share

CM Devendra Fadnavis on farmer loan waiver scheme: राज्यातील शेतकऱ्यांचं 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत थकीत पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. येत्या 10 जूनपासून याविषयीची प्रक्रिया पण सुरू होणार आहे. कर्जमाफीचा निर्णय अंतिम टप्प्यात आला आहे. पण निवडणूक आयोगाच्या निर्देशामुळे कर्जमाफीची अधिकृत घोषणा राज्य सरकारला करता येणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयीची भूमिका स्पष्ट केली आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीनंतर राज्य सरकार शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्याची शक्यता आहे.

शेतकरी कर्जमाफीविषयी घोषणा नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी योजनेविषयी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. शेतकरी कर्जमाफीवर आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होईल. याविषयीचा निर्णय होईल. निर्णयानुसारच पुढील कार्यवाही होईल. पण कुठलीही घोषणा होणार नाही. निवडणूक आयोगाने आम्हाला कर्जमाफीची घोषणा न करण्यास सांगितले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. म्हणजे कर्जमाफीचा निर्णय होणार आहे. पण त्याची घोषणा सरकारला करता येणार नाही. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी चौंडी येथील कार्यमक्रमात येत्या 10 दिवसांत कर्जमाफीचा निर्णय होईल असे जाहीर केले होते. तर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयावर अंमलबजावणीचे आदेश निघतील का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचे निकष काय?

योजनेची पात्रता: 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत थकीत पीक कर्ज माफी

कर्जमाफीचा किती फायदा: या योजनेत पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे.

नियमित कर्ज फेड करणाऱ्या उमेदवारांना प्रोत्साहन: नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार 50,000 रूपयांपर्तंचे अनुदान (Incentive Grant) देणार आहे. त्यांचे अतिरिक्त 50 हजार कर्ज माफ होईल.

सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भार: या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर अंदाजे 25 हजार कोटींचा भार पडण्याची शक्यता आहे.

आता या योजनेचा राज्यातील किती शेतकऱ्यांना लाभ होईल आणि कोणत्या बँकेतील किती शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण या कर्जमाफीमुळे ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही कर्जमाफी केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांचे खाते निरंक करण्यासाठीचे मोठे पाऊल मानले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. पण निवडणूक आयोगाच्या अटीमुळे या योजनेविषयी सरकार आता काय निर्णय घेते हे कॅबिनेट बैठकीनंतर समोर येईल.

Follow Us
इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात दुचाकीची अंत्ययात्रा
Kolhapur App Protest | इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात थेट दुचाकीची अंत्ययात्रा; सरकारविरोधात जोरदार आंदोलन
यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये रक्तरंजीत राडा!
Mumbai Local | यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजीत राडा! काय घडलं?
अजितदादांच्या आठवणीत वारकरी भावुक; जय पवार यांनीही काढली आठवण!
Jay Pawar | अजितदादांच्या आठवणीत वारकरी भावुक; जय पवार यांनीही काढली आठवण!
उद्धव ठाकरे दिल्लीला येणार का? CJP संस्थापक अभिजीत दीपकेनं दिलं थेट...
उद्धव ठाकरे दिल्लीला येणार का? CJP संस्थापक अभिजीत दीपकेनं दिलं थेट उत्तर
सुनेत्रा पवार पालकमंत्री... पण मीच पालक! पंकजा मुंडेंच्या विधानाने....
Pankaja Munde | सुनेत्रा पवार पालकमंत्री... पण मीच पालक! पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकारणात नव्या चर्चांना उधाण
अजित पवारांसह अनेकांवर होता आरोप; कोर्टाचा निर्णय येताच...
अजित पवारांसह अनेकांवर होता आरोप; कोर्टाचा निर्णय येताच पवार कुटुंबीयांना मोठा दिलासा, नेमकं प्रकरण काय?
वर्षा बंगल्यावरील बैठकीचं गूढ अखेर उलगडलं! तटकरेंनी एकाच वक्तव्यात....
Sunil Tatkare | वर्षा बंगल्यावरील बैठकीचं गूढ अखेर उलगडलं! तटकरेंनी एकाच वक्तव्यात केला मोठा खुलासा
पंढरपुरात VIP दर्शनावरून वाद! मुनगंटीवार नाराज; गुलाबराव पाटलांना मिळा
Pandharpur | पंढरपुरात VIP दर्शनावरून वाद! मुनगंटीवार नाराज; गुलाबराव पाटलांना मिळाला ग्रीन सिग्नल; नेमकं घडलं काय?
MPSC परिक्षेबाबत महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! ऑगस्ट 2027 पर्यंत...
Devendra Fadnavis | MPSC परिक्षेबाबत महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! ऑगस्ट 2027 पर्यंत...
TV9 च्या बातमीनंतर रेल्वेप्रशासन खडबडून जागं झालंय; अखेर शेतातील....
TV9 च्या बातमीनंतर रेल्वेप्रशासन खडबडून जागं झालंय; अखेर शेतातील पाणी काढण्यास सुरुवात
Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार संकटात; 2 महिन्यातच समोर सर्वात मोठी अडचण; तामिळनाडूमध्ये काय घडतंय?.

Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार संकटात; 2 महिन्यातच समोर सर्वात मोठी अडचण; तामिळनाडूमध्ये काय घडतंय?

विरार येथील अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर चार मुले बुडाली, दोघांना वाचवण्यात यश.

विरार येथील अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर चार मुले बुडाली, दोघांना वाचवण्यात यश

पाहताच क्षणी प्रेम, 15 वर्षांनंतर घटस्फोट, आदिनाथ – उर्मिलाने लेक जिजाबद्दल घेतला मोठा निर्णय.

पाहताच क्षणी प्रेम, 15 वर्षांनंतर घटस्फोट, आदिनाथ – उर्मिलाने लेक जिजाबद्दल घेतला मोठा निर्णय

Paresh Rawal : पाच वर्षात राजकारण का सोडलं? अभिनेते परेश रावल यांनी आता 12 वर्षांनी केला खुलासा.

Paresh Rawal : पाच वर्षात राजकारण का सोडलं? अभिनेते परेश रावल यांनी आता 12 वर्षांनी केला खुलासा

शहरी जेवणात मराठवाड्याच्या बहुगुणी करटोलीचा स्वाद, यंदा रानभाजीच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ.

शहरी जेवणात मराठवाड्याच्या बहुगुणी करटोलीचा स्वाद, यंदा रानभाजीच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ

शरद पवार तेव्हाच पंतप्रधान झाले असते…केंद्रीय मंत्र्याचं थेट विधान; सगळंच सांगून टाकलं!.

शरद पवार तेव्हाच पंतप्रधान झाले असते…केंद्रीय मंत्र्याचं थेट विधान; सगळंच सांगून टाकलं!