AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिताय? वेळीच सावध व्हा, नाहीतर…

चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. यामुळे दातांचे आरोग्य बिघडण्यासोबतच पचनसंस्थेवर गंभीर परिणाम होतात. चहा आणि पाणी यामध्ये नेमके किती अंतर असावे आणि तज्ज्ञांचे मत काय आहे, याची सविस्तर बातमी वाचा.

| Updated on: Apr 20, 2026 | 7:40 AM
Share
भारतीयांचे चहावरील प्रेम सर्वांनाच माहिती आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेकदा चहाचा आस्वाद घेताना दिसतात. मात्र, चहा पिण्याबाबत आपल्याकडे अनेक सवयी पाळल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे चहा प्यायल्यावर लगेच पाणी पिणे.

भारतीयांचे चहावरील प्रेम सर्वांनाच माहिती आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेकदा चहाचा आस्वाद घेताना दिसतात. मात्र, चहा पिण्याबाबत आपल्याकडे अनेक सवयी पाळल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे चहा प्यायल्यावर लगेच पाणी पिणे.

1 / 6
अनेकदा वडीलधारी मंडळी चहावर पाणी पिण्यास मनाई करतात. पण त्यामागची ठोस कारण सांगत नाही. चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतात, याबद्दल आपण जाणून घेऊया.

अनेकदा वडीलधारी मंडळी चहावर पाणी पिण्यास मनाई करतात. पण त्यामागची ठोस कारण सांगत नाही. चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतात, याबद्दल आपण जाणून घेऊया.

2 / 6
चहा गरम असतो आणि पाणी थंड किंवा सामान्य तापमानाचे असते. जेव्हा आपण गरम चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पितो, तेव्हा दातांच्या तापमानात अचानक बदल होतो. यामुळे दातांवरील संरक्षणात्मक थर म्हणजेच इनॅमल कमकुवत होते. परिणामी दात शिवशिवणे (Sensitivity) आणि हिरड्यांमधून रक्त येणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

चहा गरम असतो आणि पाणी थंड किंवा सामान्य तापमानाचे असते. जेव्हा आपण गरम चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पितो, तेव्हा दातांच्या तापमानात अचानक बदल होतो. यामुळे दातांवरील संरक्षणात्मक थर म्हणजेच इनॅमल कमकुवत होते. परिणामी दात शिवशिवणे (Sensitivity) आणि हिरड्यांमधून रक्त येणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

3 / 6
चहामध्ये कॅफिन आणि टॅनिन असते. चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पोटातील पाचक रसांची तीव्रता कमी होते. यामुळे अन्नाचे पचन नीट होत नाही. तसेच ॲसिडिटी, गॅस किंवा पोट फुगणे यांसारख्या तक्रारी सुरू होतात.

चहामध्ये कॅफिन आणि टॅनिन असते. चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पोटातील पाचक रसांची तीव्रता कमी होते. यामुळे अन्नाचे पचन नीट होत नाही. तसेच ॲसिडिटी, गॅस किंवा पोट फुगणे यांसारख्या तक्रारी सुरू होतात.

4 / 6
गरम चहा आणि थंड पाणी यांच्यातील तापमानाचा मोठा फरक पोटाच्या संवेदनशील अस्तरांना इजा पोहोचवू शकतो. तज्ज्ञांच्या मते, दीर्घकाळ ही सवय राहिल्यास पोटाचा अल्सर होण्याचा धोका वाढतो. शरीराच्या तापमानात अचानक होणाऱ्या बदलामुळे रोगप्रतिकार शक्तीवर ताण येतो. यामुळे थंड-गरम होऊन घसा बसणे, घसा खवखवणे किंवा अचानक सर्दी होण्याचे प्रमाण वाढते.

गरम चहा आणि थंड पाणी यांच्यातील तापमानाचा मोठा फरक पोटाच्या संवेदनशील अस्तरांना इजा पोहोचवू शकतो. तज्ज्ञांच्या मते, दीर्घकाळ ही सवय राहिल्यास पोटाचा अल्सर होण्याचा धोका वाढतो. शरीराच्या तापमानात अचानक होणाऱ्या बदलामुळे रोगप्रतिकार शक्तीवर ताण येतो. यामुळे थंड-गरम होऊन घसा बसणे, घसा खवखवणे किंवा अचानक सर्दी होण्याचे प्रमाण वाढते.

5 / 6
चहा किंवा कॉफी घेतल्यानंतर किमान १५ ते २० मिनिटांनी पाणी प्यावे. जेणेकरून शरीराचे तापमान सामान्य होईल. चहा पिण्यापूर्वी १०-१५ मिनिटे आधी पाणी पिणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. यामुळे चहामधील ॲसिडचा परिणाम कमी होतो.

चहा किंवा कॉफी घेतल्यानंतर किमान १५ ते २० मिनिटांनी पाणी प्यावे. जेणेकरून शरीराचे तापमान सामान्य होईल. चहा पिण्यापूर्वी १०-१५ मिनिटे आधी पाणी पिणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. यामुळे चहामधील ॲसिडचा परिणाम कमी होतो.

6 / 6
Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत