AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रस्त्यावर सापडलेले सोने उचलल्याने तुम्ही श्रीमंत व्हाल की कंगाल? जाणून घ्या

रस्त्यावर सापडलेले सोने घेणे शुभ असते की अशुभ? शकुन शास्त्रानुसार सोन्याचे हरवणे किंवा सापडणे तुमच्या आयुष्यावर आणि कुंडलीतील गुरु ग्रहावर कसा परिणाम करते, याबद्दलची सविस्तर माहिती आणि उपाय येथे वाचा.

| Updated on: Apr 21, 2026 | 1:04 PM
Share
रस्त्यावर चालताना सोन्याचे दागिने किंवा नाणी सापडल्यास आपण त्याला लक्ष्मीची कृपा किंवा नशीब समजतो. पण रस्त्यावर सापडलेले हे सोने तुम्हाला श्रीमंत नाही तर कंगाल करु शकते. ऐकून धक्का बसला ना, पण हे खरं आहे.

रस्त्यावर चालताना सोन्याचे दागिने किंवा नाणी सापडल्यास आपण त्याला लक्ष्मीची कृपा किंवा नशीब समजतो. पण रस्त्यावर सापडलेले हे सोने तुम्हाला श्रीमंत नाही तर कंगाल करु शकते. ऐकून धक्का बसला ना, पण हे खरं आहे.

1 / 8
भारतीय शकुन शास्त्रानुसार रस्त्यावर सापडलेले सोने घेणे ही घटना भविष्यातील मोठ्या संकटाची नांदी असू शकते. सोने हे केवळ एक मौल्यवान धातू नसून ते गुरु ग्रह आणि देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे सोन्याशी संबंधित घडामोडी तुमच्या कुंडलीवर आणि नशिबावर थेट परिणाम करतात.

भारतीय शकुन शास्त्रानुसार रस्त्यावर सापडलेले सोने घेणे ही घटना भविष्यातील मोठ्या संकटाची नांदी असू शकते. सोने हे केवळ एक मौल्यवान धातू नसून ते गुरु ग्रह आणि देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे सोन्याशी संबंधित घडामोडी तुमच्या कुंडलीवर आणि नशिबावर थेट परिणाम करतात.

2 / 8
शकुन शास्त्रानुसार, सहजपणे कोणत्याही कष्टाशिवाय मिळालेले सोने आयुष्यात नकारात्मकता घेऊन येते. ज्या व्यक्तीचे सोने हरवले असते, त्या व्यक्तीचे दुःख आणि त्यावेळची नकारात्मक ऊर्जा ही त्या धातूमध्ये सामावलेली असते. जर तुम्ही ते सोने उचलून स्वतःकडे ठेवले, तर त्या व्यक्तीचे दुर्दैव तुमच्या वाट्याला येऊ शकते, असा समज आहे.

शकुन शास्त्रानुसार, सहजपणे कोणत्याही कष्टाशिवाय मिळालेले सोने आयुष्यात नकारात्मकता घेऊन येते. ज्या व्यक्तीचे सोने हरवले असते, त्या व्यक्तीचे दुःख आणि त्यावेळची नकारात्मक ऊर्जा ही त्या धातूमध्ये सामावलेली असते. जर तुम्ही ते सोने उचलून स्वतःकडे ठेवले, तर त्या व्यक्तीचे दुर्दैव तुमच्या वाट्याला येऊ शकते, असा समज आहे.

3 / 8
तुमचे स्वतःचे सोने अचानक हरवल्यास त्याकडे केवळ एक आर्थिक नुकसान म्हणून पाहू नका, कारण शकुन शास्त्रानुसार हे भविष्यातील मोठ्या संकटाचे संकेत असू शकतात. सोने हरवणे हे येऊ घातलेले मानसिक संकट, प्रचंड तणाव किंवा तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये अचानक निर्माण होणाऱ्या अडथळ्यांचे लक्षण मानले जाते.

तुमचे स्वतःचे सोने अचानक हरवल्यास त्याकडे केवळ एक आर्थिक नुकसान म्हणून पाहू नका, कारण शकुन शास्त्रानुसार हे भविष्यातील मोठ्या संकटाचे संकेत असू शकतात. सोने हरवणे हे येऊ घातलेले मानसिक संकट, प्रचंड तणाव किंवा तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये अचानक निर्माण होणाऱ्या अडथळ्यांचे लक्षण मानले जाते.

4 / 8
ज्योतिषशास्त्रानुसार, सोन्याचा संबंध गुरु ग्रहाशी असतो; त्यामुळे सोने गमावल्याने कुंडलीतील गुरु ग्रहाची स्थिती कमकुवत होऊ शकते, ज्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या ज्ञानप्राप्तीवर आणि संतती सुखावर होण्याची शक्यता असते.

ज्योतिषशास्त्रानुसार, सोन्याचा संबंध गुरु ग्रहाशी असतो; त्यामुळे सोने गमावल्याने कुंडलीतील गुरु ग्रहाची स्थिती कमकुवत होऊ शकते, ज्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या ज्ञानप्राप्तीवर आणि संतती सुखावर होण्याची शक्यता असते.

5 / 8
सर्वच परिस्थितीत सोने सापडणे अशुभ नसते. जर तुम्हाला एखाद्या धार्मिक स्थळी, तीर्थक्षेत्री किंवा अत्यंत शुभ प्रसंगी सोने भेट म्हणून मिळाले किंवा सापडले, तर ते समृद्धीचे लक्षण मानले जाते.

सर्वच परिस्थितीत सोने सापडणे अशुभ नसते. जर तुम्हाला एखाद्या धार्मिक स्थळी, तीर्थक्षेत्री किंवा अत्यंत शुभ प्रसंगी सोने भेट म्हणून मिळाले किंवा सापडले, तर ते समृद्धीचे लक्षण मानले जाते.

6 / 8
 जर तुम्हाला रस्त्यात सोने सापडले, तर शकुन शास्त्रानुसार काही विशिष्ट उपाय करणे तुमच्या हिताचे ठरते. अशा वेळी सर्वप्रथम त्या सोन्याच्या मूळ मालकाचा शोध घेऊन ते त्याला परत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा.

जर तुम्हाला रस्त्यात सोने सापडले, तर शकुन शास्त्रानुसार काही विशिष्ट उपाय करणे तुमच्या हिताचे ठरते. अशा वेळी सर्वप्रथम त्या सोन्याच्या मूळ मालकाचा शोध घेऊन ते त्याला परत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा.

7 / 8
जर मालक सापडत नसेल तर ते सोने स्वतःसाठी न वापरता मंदिरात दान करावे. असे केल्याने त्या धातूशी संबंधित नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव नष्ट होतो. जर स्वतःचे सोने हरवल्यास घाबरून न जाता कुलदैवताची प्रार्थना करावी आणि परिस्थितीनुसार गरजूंना काही वस्तू दान कराव्यात; यामुळे ग्रहांचे दुष्परिणाम कमी होऊन येऊ घातलेल्या संकटाची तीव्रता कमी होण्यास मदत होते.

जर मालक सापडत नसेल तर ते सोने स्वतःसाठी न वापरता मंदिरात दान करावे. असे केल्याने त्या धातूशी संबंधित नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव नष्ट होतो. जर स्वतःचे सोने हरवल्यास घाबरून न जाता कुलदैवताची प्रार्थना करावी आणि परिस्थितीनुसार गरजूंना काही वस्तू दान कराव्यात; यामुळे ग्रहांचे दुष्परिणाम कमी होऊन येऊ घातलेल्या संकटाची तीव्रता कमी होण्यास मदत होते.

8 / 8
Follow Us
खरातच्या गुन्ह्यांचा अंतच नाही! नाशिकच्या सिन्नरमध्ये 15वा गुन्हा दाखल
खरातच्या गुन्ह्यांचा अंतच नाही! नाशिकच्या सिन्नरमध्ये 15वा गुन्हा दाखल.
सुळे यांचा थेट सरकारला सवाल, विधेयक मंजूर, मग अंमलबजावणी का नाही?
सुळे यांचा थेट सरकारला सवाल, विधेयक मंजूर, मग अंमलबजावणी का नाही?.
महिला आरक्षण विधेयकावरून राजकीय घमासान; मुख्यमंत्री फडणवीसांचे आव्हान
महिला आरक्षण विधेयकावरून राजकीय घमासान; मुख्यमंत्री फडणवीसांचे आव्हान.
भाजपवाले काय म्हणतात ते त्यांनाही कळत नाही, ही जप्त केलेल्या ड्रग्सची
भाजपवाले काय म्हणतात ते त्यांनाही कळत नाही, ही जप्त केलेल्या ड्रग्सची.
स्वत:च्या जीवावर जिंकतो, आमदाराचं एकनाथ शिंदेंना आव्हान!
स्वत:च्या जीवावर जिंकतो, आमदाराचं एकनाथ शिंदेंना आव्हान!.
मराठी न आल्यास रिक्षा चालकांचा परवाना रद्द, या तारखेपासून नियम लागू
मराठी न आल्यास रिक्षा चालकांचा परवाना रद्द, या तारखेपासून नियम लागू.
हातात पिस्तूल, पैशांचे बंडल, अन्... अमरावतीतील आरोपीची रॉयल लाईफस्टाईल
हातात पिस्तूल, पैशांचे बंडल, अन्... अमरावतीतील आरोपीची रॉयल लाईफस्टाईल.
जय पवारांचं प्रत्येक मंगळवारी जनता दरबार भरवणार, कारण...
जय पवारांचं प्रत्येक मंगळवारी जनता दरबार भरवणार, कारण....
अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात अल्पवयीन मुलीने दिली संवेदनशील माहिती
अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात अल्पवयीन मुलीने दिली संवेदनशील माहिती.
नाशिक आयटी कंपनीतील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणी
नाशिक आयटी कंपनीतील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणी.