AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर आधारित फिल्म, सीन शूट करताना ढसाढसा रडला अभिषेक बच्चन

बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत, जे सर्वसाधारण संकल्पनांपेक्षा हटके बनले आहेत. असे चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाले तेव्हा काही प्रेक्षकांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला, तर काहींनी त्यावर टीका केली. परंतु अशाच एका चित्रपटातील कलाकाराच ती कथा आवडली नव्हती.

| Updated on: Jan 23, 2026 | 3:47 PM
Share
बॉलिवूडमध्ये एक अत्यंत लोकप्रिय मल्टीस्टारर चित्रपट, ज्यामध्ये अनेक मोठमोठ्या कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. त्यापैकी एका कलाकारानेच चित्रपटाच्या कथेवर आक्षेप घेतला होता, कारण ती कथा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणजेच विवाहबाह्य संबंधावर आधारित होती.

बॉलिवूडमध्ये एक अत्यंत लोकप्रिय मल्टीस्टारर चित्रपट, ज्यामध्ये अनेक मोठमोठ्या कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. त्यापैकी एका कलाकारानेच चित्रपटाच्या कथेवर आक्षेप घेतला होता, कारण ती कथा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणजेच विवाहबाह्य संबंधावर आधारित होती.

1 / 5
2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं नाव 'कभी अलविदा ना कहना' असं आहे. या चित्रपटात शाहरुख खान, राणी मुखर्जी, अभिषेक बच्चन, प्रिती झिंटा आणि अमिताभ बच्चन यांच्या मुख्य भूमिका होत्या. विवाहित जोडप्यांवर आधारित या चित्रपटाची कथा होती, जे एकमेकांसोबत खुश नसतात. त्यानंतर चित्रपटात शाहरुख आणि रानीचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरू होतं.

2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं नाव 'कभी अलविदा ना कहना' असं आहे. या चित्रपटात शाहरुख खान, राणी मुखर्जी, अभिषेक बच्चन, प्रिती झिंटा आणि अमिताभ बच्चन यांच्या मुख्य भूमिका होत्या. विवाहित जोडप्यांवर आधारित या चित्रपटाची कथा होती, जे एकमेकांसोबत खुश नसतात. त्यानंतर चित्रपटात शाहरुख आणि रानीचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरू होतं.

2 / 5
दिग्दर्शक करण जोहरने या चित्रपटाबद्दल बोलताना सांगितलं होतं की, त्याच्या कथेचा सर्वांच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता. प्रिती झिंटा ही गोष्ट स्वीकारायलाच तयार नव्हती की शाहरुखची भूमिका तिच्यासारखी महिलेची फसवणूक करेल.

दिग्दर्शक करण जोहरने या चित्रपटाबद्दल बोलताना सांगितलं होतं की, त्याच्या कथेचा सर्वांच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता. प्रिती झिंटा ही गोष्ट स्वीकारायलाच तयार नव्हती की शाहरुखची भूमिका तिच्यासारखी महिलेची फसवणूक करेल.

3 / 5
करण जोहरने पुढे असाही खुलासा केला की अभिषेक बच्चनसुद्धा एका सीनदरम्यान ढसाढसा रडला होता. तो अत्यंत भावनिक सीन होता. मला असं जाणवलं की प्रिती झिंटापासून अभिषेक बच्चनपर्यंत प्रत्येकजण त्यांच्या मनात अनेक चढउतारांमधून जात होता.

करण जोहरने पुढे असाही खुलासा केला की अभिषेक बच्चनसुद्धा एका सीनदरम्यान ढसाढसा रडला होता. तो अत्यंत भावनिक सीन होता. मला असं जाणवलं की प्रिती झिंटापासून अभिषेक बच्चनपर्यंत प्रत्येकजण त्यांच्या मनात अनेक चढउतारांमधून जात होता.

4 / 5
या चित्रपटात मूळ वास्तवाबद्दल आणि अत्यंत भावनिक वास्तवाबद्दल बोललं गेलं होतं. अशा गोष्टी ज्यातून लोक जातात, पण त्याबद्दल सहसा बोलत नाहीत. तो अनुभव खूपच अशांत करणारा होता, असं करण पुढे म्हणाला.

या चित्रपटात मूळ वास्तवाबद्दल आणि अत्यंत भावनिक वास्तवाबद्दल बोललं गेलं होतं. अशा गोष्टी ज्यातून लोक जातात, पण त्याबद्दल सहसा बोलत नाहीत. तो अनुभव खूपच अशांत करणारा होता, असं करण पुढे म्हणाला.

5 / 5
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.