AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतून 7 खेळाडूंचा पत्ता कट, कोण आहेत ते जाणून घ्या

आशिया कप स्पर्धा संपल्यानंतर लगेचच भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी 15 खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली आहे. यावेळी सात खेळाडूंना डावलण्यात आलं आहे. कोण आहेत ते जाणून घेऊयात

| Updated on: Sep 26, 2025 | 10:20 PM
Share
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी भारताच्या कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील संघात सात खेळाडूंना डावलण्यात आलं आहे. या खेळाडूंचा इंग्लंड दौऱ्यात सहभाग होता. मात्र वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्यांचा विचार केला गेला नाही. कोण आहेत हे खेळाडू आणि का वगळण्यात आलं ते जाणून घेऊयात.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी भारताच्या कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील संघात सात खेळाडूंना डावलण्यात आलं आहे. या खेळाडूंचा इंग्लंड दौऱ्यात सहभाग होता. मात्र वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्यांचा विचार केला गेला नाही. कोण आहेत हे खेळाडू आणि का वगळण्यात आलं ते जाणून घेऊयात.

1 / 8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ऋषभ पंत टीम इंडियाचा यष्टीरक्षक-फलंदाज होता. तसेच त्याच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची धुरा होता. पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी पंत नाही. कारण इंग्लंड मालिकेत झालेल्या दुखापतीतून तो सावरलेला नाही. त्यामुळे त्याचा विचार केला गेला नाही.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ऋषभ पंत टीम इंडियाचा यष्टीरक्षक-फलंदाज होता. तसेच त्याच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची धुरा होता. पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी पंत नाही. कारण इंग्लंड मालिकेत झालेल्या दुखापतीतून तो सावरलेला नाही. त्यामुळे त्याचा विचार केला गेला नाही.

2 / 8
आठ वर्षानंतर इंग्लंड दौऱ्यात करूण नायरचा विचार केला गेला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्याने त्याला संधी मिळाली होती. मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाही. इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या 8 डावात त्याने फक्त 205 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याचा विचार केला गेला नाही.

आठ वर्षानंतर इंग्लंड दौऱ्यात करूण नायरचा विचार केला गेला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्याने त्याला संधी मिळाली होती. मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाही. इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या 8 डावात त्याने फक्त 205 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याचा विचार केला गेला नाही.

3 / 8
अष्टपैलू शार्दुल ठाकुर यालाही संघातून डावलण्यात आलं आहे. त्याच्याकडून इंग्लंड दौऱ्यात फार अपेक्षा होत्या. मात्र अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे त्याच्या विचार केला गेला नाही.

अष्टपैलू शार्दुल ठाकुर यालाही संघातून डावलण्यात आलं आहे. त्याच्याकडून इंग्लंड दौऱ्यात फार अपेक्षा होत्या. मात्र अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे त्याच्या विचार केला गेला नाही.

4 / 8
अभिमन्यू ईश्वरन हा कमनशिबी निघाला. त्याची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झाली होती. पण पाचही कसोटी सामन्यात बेंचबर बसला. त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली नाही. आता वेस्ट इंडिज दौऱ्यातूनही वगळण्यात आलं आहे.

अभिमन्यू ईश्वरन हा कमनशिबी निघाला. त्याची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झाली होती. पण पाचही कसोटी सामन्यात बेंचबर बसला. त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली नाही. आता वेस्ट इंडिज दौऱ्यातूनही वगळण्यात आलं आहे.

5 / 8
आकाश दीपने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तीन सामने खेळले. या मालिकेत आकाशने इंग्लंडला जेरीस आणलं होतं. आकाशने चांगले आक्रमण केले आणि एकूण 13 विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी आकाश दीपची निवड झाली नाही हे आश्चर्यकारक आहे.

आकाश दीपने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तीन सामने खेळले. या मालिकेत आकाशने इंग्लंडला जेरीस आणलं होतं. आकाशने चांगले आक्रमण केले आणि एकूण 13 विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी आकाश दीपची निवड झाली नाही हे आश्चर्यकारक आहे.

6 / 8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी अर्शदीप सिंग दुखापतग्रस्त झाला होता. तेव्हा त्याच्या जागी युवा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजची निवड करण्यात आली. चौथ्या कसोटी सामन्यात मैदानात उतरलेल्या कंबोजने अपेक्षेनुसार कामगिरी केली नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली नाही.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी अर्शदीप सिंग दुखापतग्रस्त झाला होता. तेव्हा त्याच्या जागी युवा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजची निवड करण्यात आली. चौथ्या कसोटी सामन्यात मैदानात उतरलेल्या कंबोजने अपेक्षेनुसार कामगिरी केली नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली नाही.

7 / 8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत अतिरिक्त वेगवान गोलंदाज म्हणून खेळवण्यात आलेल्या अर्शदीप सिंगची यावेळी निवड झालेली नाही. टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्ध तीन वेगवान गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अर्शदीप सिंगला स्थान मिळालेले नाही.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत अतिरिक्त वेगवान गोलंदाज म्हणून खेळवण्यात आलेल्या अर्शदीप सिंगची यावेळी निवड झालेली नाही. टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्ध तीन वेगवान गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अर्शदीप सिंगला स्थान मिळालेले नाही.

8 / 8
Follow Us
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.