AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : मेलबर्न कसोटीत या पाच चुका ठरल्या पराभवाचं कारण, जाणून घ्या

मेलबर्न कसोटी सामन्यात टीम इंडियाचा 184 धावांनी दारूण पराभव झाला आहे. त्यामुळे मालिका विजयाचं स्वप्न भंगलं आहे. पाचव्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला तर मालिका बरोबरीत सुटेल. चार सामन्यानंतर ऑस्ट्रेलिया 2-1 ने आघाडीवर आहे.

| Updated on: Dec 30, 2024 | 5:10 PM
Share
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात टीम इंडियाने निराशाजनक कामगिरी केली. या सामन्यात पाच महत्त्वाचा चुका टीम इंडियाला भोवल्या. खरं तर तिसऱ्या दिवशी सामना भारताच्या पारड्यात पडला होता. मात्र पाच चुकांमुळे सर्व काही गमवण्याची वेळ आली.

बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात टीम इंडियाने निराशाजनक कामगिरी केली. या सामन्यात पाच महत्त्वाचा चुका टीम इंडियाला भोवल्या. खरं तर तिसऱ्या दिवशी सामना भारताच्या पारड्यात पडला होता. मात्र पाच चुकांमुळे सर्व काही गमवण्याची वेळ आली.

1 / 6
चौथ्या कसोटी सामन्यात रोहित शर्माचं नेतृत्व अपयशी ठरलं. खरं तर चौथ्या कसोटीत शुबमन गिलला वगळणं टीम इंडियाला महागात पडलं. तसेच कधी कोणता गोलंदाज काढावा याचं गणित रोहितला उमगलं नाही. त्यामुळे शेवटच्या विकेटसाठी ऑस्ट्रेलियाने 61 धावांची भागीदारी केली.

चौथ्या कसोटी सामन्यात रोहित शर्माचं नेतृत्व अपयशी ठरलं. खरं तर चौथ्या कसोटीत शुबमन गिलला वगळणं टीम इंडियाला महागात पडलं. तसेच कधी कोणता गोलंदाज काढावा याचं गणित रोहितला उमगलं नाही. त्यामुळे शेवटच्या विकेटसाठी ऑस्ट्रेलियाने 61 धावांची भागीदारी केली.

2 / 6
रोहित शर्मा आणि विराट कोहली या मालिकेत फार काही ग्रेट करू शकले नाहीत. चौथ्या कसोटीत या दोघांकडून फार अपेक्षा होत्या. रोहितने दोन्ही डावात मिळून 12 धावा केल्या. तर विराट कोहलीने 41 धावा केल्या. या दोघांची बॅट चालली असती तर कदाचित वेगळं चित्र असतं.

रोहित शर्मा आणि विराट कोहली या मालिकेत फार काही ग्रेट करू शकले नाहीत. चौथ्या कसोटीत या दोघांकडून फार अपेक्षा होत्या. रोहितने दोन्ही डावात मिळून 12 धावा केल्या. तर विराट कोहलीने 41 धावा केल्या. या दोघांची बॅट चालली असती तर कदाचित वेगळं चित्र असतं.

3 / 6
मेलबर्न कसोटीत फलंदाजीचा क्रम बदलणं टीम इंडियाच्या अंगलट आलं. रोहित शर्मा ओपनर म्हणून अपयशी ठरला. तर केएल राहुल तिसऱ्या स्थानावर गडगडला. केएल राहुलने पहिल्या तीन सामन्यात ओपनर म्हणून चांगली कामगिरी केली होती. पण तिसऱ्या स्थानावर निराशाजनक कामगिरी राहिली.

मेलबर्न कसोटीत फलंदाजीचा क्रम बदलणं टीम इंडियाच्या अंगलट आलं. रोहित शर्मा ओपनर म्हणून अपयशी ठरला. तर केएल राहुल तिसऱ्या स्थानावर गडगडला. केएल राहुलने पहिल्या तीन सामन्यात ओपनर म्हणून चांगली कामगिरी केली होती. पण तिसऱ्या स्थानावर निराशाजनक कामगिरी राहिली.

4 / 6
ऋषभ पंतची बेजबाबदार खेळीही पराभवाला कारणीभूत ठरली. चुकीच्या शॉट सिलेक्शनमुळे टीम इंडियाला फटका बसला. दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालसोबत भागीदारी जमली होती. पण मोठा फटका मारण्याच्या नादात टीम इंडियाला पराभवाच्या दरीत ढकललं.

ऋषभ पंतची बेजबाबदार खेळीही पराभवाला कारणीभूत ठरली. चुकीच्या शॉट सिलेक्शनमुळे टीम इंडियाला फटका बसला. दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालसोबत भागीदारी जमली होती. पण मोठा फटका मारण्याच्या नादात टीम इंडियाला पराभवाच्या दरीत ढकललं.

5 / 6
टीम इंडिया मेलबर्न कसोटी वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा या दोन फिरकीपटूंसह मैदानात उतरली होती. हा निर्णय टीम इंडियाच्या उलट पडला. जडेजाला पहिल्या डावात 3, तर दुसऱ्या डावात 1 विकेट घेण्यात यश आलं. सुंदरला दोन्ही डावात प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

टीम इंडिया मेलबर्न कसोटी वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा या दोन फिरकीपटूंसह मैदानात उतरली होती. हा निर्णय टीम इंडियाच्या उलट पडला. जडेजाला पहिल्या डावात 3, तर दुसऱ्या डावात 1 विकेट घेण्यात यश आलं. सुंदरला दोन्ही डावात प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

6 / 6
Follow Us
गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
Rahul Gandhi | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि...
JP Nadda | नीट आंदोलनाला मोठं यश; जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि परीक्षा सुधारणांवरही सकारात्मक निर्णय
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक..
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक...
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबत
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय
तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
Raj Thackeray | तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने...
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया
Sharad Pawar | धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपके...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपकेच्या विधानेने अनेकाच्या भुवया उंचावल्या
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?; त्या बड्या नेत्याने नावच सांगून टाकलं