AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: धर्मशालातले आकडे भारताविरोधात, पहिल्या T20 विजयाची प्रतीक्षा, श्रीलंकेसाठी मौका-मौका!

भारत आणि श्रीलंका यांच्यात धर्मशाला येथे 10 डिसेंबर 2017 रोजी सामना खेळवण्यात आला होता. या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा डाव अवघ्या 112 धावांत गुंडाळला गेला आणि श्रीलंकेने केवळ 20.4 षटकांत 3 गडी गमावून लक्ष्य गाठले.

अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Feb 26, 2022 | 10:54 AM
Share
श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात (India vs Sri Lanka) टीम इंडियाने पाहुण्यांची धुळधाण उडवली.  लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारताने 62 धावांनी एकतर्फी विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र, आता टीम इंडियासमोरचं आव्हान मोठं आहे. कारण टीम इंडियाला आता त्या मैदानावर सामना खेळायचा आहे जिथे ते कधीही जिंकू शकले नाहीत. यासोबतच श्रीलंकेनेही टीम इंडियाला (Team India) तिथे धूळ चारली आहे. T20 मालिकेतील पुढील सामना धर्मशाला (India vs Sri Lanka, 2nd T20I) येथे खेळवला जाणार आहे. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या या मैदानावर शनिवारी हा सामना होणार आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात (India vs Sri Lanka) टीम इंडियाने पाहुण्यांची धुळधाण उडवली. लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारताने 62 धावांनी एकतर्फी विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र, आता टीम इंडियासमोरचं आव्हान मोठं आहे. कारण टीम इंडियाला आता त्या मैदानावर सामना खेळायचा आहे जिथे ते कधीही जिंकू शकले नाहीत. यासोबतच श्रीलंकेनेही टीम इंडियाला (Team India) तिथे धूळ चारली आहे. T20 मालिकेतील पुढील सामना धर्मशाला (India vs Sri Lanka, 2nd T20I) येथे खेळवला जाणार आहे. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या या मैदानावर शनिवारी हा सामना होणार आहे.

1 / 5
भारताने धर्मशाला येथे आतापर्यंत 6 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यात 3 जिंकले आहेत आणि 3 सामन्यांमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला आहे. या 6 सामन्यांपैकी एकच सामना T20 फॉरमॅटचा होता, जो भारताने 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. त्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.

भारताने धर्मशाला येथे आतापर्यंत 6 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यात 3 जिंकले आहेत आणि 3 सामन्यांमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला आहे. या 6 सामन्यांपैकी एकच सामना T20 फॉरमॅटचा होता, जो भारताने 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. त्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.

2 / 5
भारत आणि श्रीलंका यांच्यात धर्मशाला येथे 10 डिसेंबर 2017 रोजी सामना खेळवण्यात आला होता. या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा डाव अवघ्या 112 धावांत गुंडाळला गेला आणि श्रीलंकेने केवळ 20.4 षटकांत 3 गडी गमावून लक्ष्य गाठले. म्हणजे श्रीलंकेने टीम इंडियाचा 176 चेंडूत पराभव केला, हा यजमानांचा मोठा पराभव होता. धर्मशालामध्ये त्या दिवशी टीम इंडियाची टॉप ऑर्डर पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. पहिल्या 5 फलंदाजांना दुहेरी आकडादेखील गाठता आला नाही. विशेष म्हणजे त्या सामन्यात रोहित शर्मा कर्णधार होता.

भारत आणि श्रीलंका यांच्यात धर्मशाला येथे 10 डिसेंबर 2017 रोजी सामना खेळवण्यात आला होता. या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा डाव अवघ्या 112 धावांत गुंडाळला गेला आणि श्रीलंकेने केवळ 20.4 षटकांत 3 गडी गमावून लक्ष्य गाठले. म्हणजे श्रीलंकेने टीम इंडियाचा 176 चेंडूत पराभव केला, हा यजमानांचा मोठा पराभव होता. धर्मशालामध्ये त्या दिवशी टीम इंडियाची टॉप ऑर्डर पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. पहिल्या 5 फलंदाजांना दुहेरी आकडादेखील गाठता आला नाही. विशेष म्हणजे त्या सामन्यात रोहित शर्मा कर्णधार होता.

3 / 5
धर्मशाला येथे पावसामुळे भारताचे मागील 2 सामने रद्द करण्यात आले आहेत. पावसामुळे या दोन्ही सामन्यांमध्ये नाणेफेकदेखील झाली नाही.

धर्मशाला येथे पावसामुळे भारताचे मागील 2 सामने रद्द करण्यात आले आहेत. पावसामुळे या दोन्ही सामन्यांमध्ये नाणेफेकदेखील झाली नाही.

4 / 5
भारतीय संघ आज धर्मशाला येथे पहिला T20 विजय नोंदवण्यासाठी उतरेल. जर टीम इंडिया ही कामगिरी करु शकली नाही तर भारताचा विजयरथ थांबेल. भारतात खेळल्या गेलेल्या शेवटच्या 16 T20 सामन्यांमध्ये श्रीलंकेला 12 पराभव पत्करावे लागले आहेत. त्याच वेळी, श्रीलंकेला केवळ 3 सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे.  (फोटो: BCCI/AFP/AP)

भारतीय संघ आज धर्मशाला येथे पहिला T20 विजय नोंदवण्यासाठी उतरेल. जर टीम इंडिया ही कामगिरी करु शकली नाही तर भारताचा विजयरथ थांबेल. भारतात खेळल्या गेलेल्या शेवटच्या 16 T20 सामन्यांमध्ये श्रीलंकेला 12 पराभव पत्करावे लागले आहेत. त्याच वेळी, श्रीलंकेला केवळ 3 सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. (फोटो: BCCI/AFP/AP)

5 / 5
Follow Us
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले माझा फोन हॅक...
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत; उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत;  उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी सांगितलं बैठकीत काय घडलं?