AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहलीचं पुढचं भवितव्य आता आयपीएलवर! बीसीसीआयच्या त्या निर्णयामुळे पेच

आयपीएल 2024 स्पर्धा 22 मार्चपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होत आहे. या स्पर्धेतून विराट कोहली क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. गेल्या एक महिन्यापासून विराट कोहली क्रिकेट खेळलेला नाही. त्यामुळे आता पुढील वाटचाल ही आयपीएलवर अवलंबून असणार आहे.

| Updated on: Mar 12, 2024 | 5:50 PM
Share
आयपीएल स्पर्धेचं 17 वं पर्व 22 मार्चपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी दहा संघ सज्ज असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पहिल्या जेतेपदासाठी आतुर आहे. पहिलाच सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. या सामन्यातून विराट कोहली पुन्हा एकदा मैदानात दिसणार आहे.

आयपीएल स्पर्धेचं 17 वं पर्व 22 मार्चपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी दहा संघ सज्ज असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पहिल्या जेतेपदासाठी आतुर आहे. पहिलाच सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. या सामन्यातून विराट कोहली पुन्हा एकदा मैदानात दिसणार आहे.

1 / 6
17 जानेवारी 2024 नंतर विराट कोहली एकही सामना खेळलेला नाही. आता आयपीएलच्या माध्यमातून पुन्हा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. किंग कोहलीचे टी20 विश्वचषकाचं भवितव्य या स्पर्धेवर अवलंबून आहे.

17 जानेवारी 2024 नंतर विराट कोहली एकही सामना खेळलेला नाही. आता आयपीएलच्या माध्यमातून पुन्हा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. किंग कोहलीचे टी20 विश्वचषकाचं भवितव्य या स्पर्धेवर अवलंबून आहे.

2 / 6
आयपीएलमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना टी20 वर्ल्डकप संघात देण्यात येईल असं बीसीसीआयने आधीच स्पष्ट केलं आहे. गेल्या वर्षभरापासून विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळला नव्हता. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातून पुनरागमन केलं. पण हवी तशी छाप सोडता आली नाही.

आयपीएलमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना टी20 वर्ल्डकप संघात देण्यात येईल असं बीसीसीआयने आधीच स्पष्ट केलं आहे. गेल्या वर्षभरापासून विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळला नव्हता. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातून पुनरागमन केलं. पण हवी तशी छाप सोडता आली नाही.

3 / 6
अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत 2 सामने खेळणाऱ्या कोहलीने एका सामन्यात 29 धावा केल्या आणि दुसऱ्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला. त्यामुळे टी20 विश्वचषक संघ निवडीसाठी विराट कोहलीचा विचार केला जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत 2 सामने खेळणाऱ्या कोहलीने एका सामन्यात 29 धावा केल्या आणि दुसऱ्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला. त्यामुळे टी20 विश्वचषक संघ निवडीसाठी विराट कोहलीचा विचार केला जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

4 / 6
टी20 विश्वचषक संघ निवडीसाठी आयपीएलच्या कामगिरीचा विचार केला जाईल, असे बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे विराट कोहलीला आयपीएलमध्ये आपली सर्वोत्तम कामगिरी दाखवावी लागेल. त्यानंतरच त्याच्या निवडीसाठी विचार केला जाईल, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

टी20 विश्वचषक संघ निवडीसाठी आयपीएलच्या कामगिरीचा विचार केला जाईल, असे बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे विराट कोहलीला आयपीएलमध्ये आपली सर्वोत्तम कामगिरी दाखवावी लागेल. त्यानंतरच त्याच्या निवडीसाठी विचार केला जाईल, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

5 / 6
विराट कोहलीचे टी20 विश्वचषकातील भवितव्य आयपीएलच्या 14 सामन्यांमधील कामगिरीवर अवलंबून असेल. त्यामुळे विराट कोहली आता आपली छाप 14 सामन्यात सोडतो का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

विराट कोहलीचे टी20 विश्वचषकातील भवितव्य आयपीएलच्या 14 सामन्यांमधील कामगिरीवर अवलंबून असेल. त्यामुळे विराट कोहली आता आपली छाप 14 सामन्यात सोडतो का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

6 / 6
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.