AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 Cricket : विराट कोहली आणि रोहित शर्मा टी20 क्रिकेट का खेळत नाही? हिटमॅनने सांगितलं कारण

टी20 वर्ल्डकप स्पर्धा 2022 पासून रोहित शर्मा आणि विराट कोहली या फॉर्मेटमध्ये खेळत नाहीत. तसेच संघाचं नेतृत्व हार्दिक पांड्या याच्याकडे सोपण्यात आलं आहे. विराट-रोहित खेळणारच नाहीत अशी चर्चा रंगली आहे. त्यावर हिटमॅन रोहित शर्मा याने मौन सोडलं आहे.

| Updated on: Aug 12, 2023 | 5:38 PM
Share
आयसीसी टी20 वर्ल्डकप 2022 स्पर्धेत भारताचं उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात आलं. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली एकही टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळले नाहीत. 10 नोव्हेंबर 2022 रोजी इंग्लंडने उपांत्य फेरीत भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता.

आयसीसी टी20 वर्ल्डकप 2022 स्पर्धेत भारताचं उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात आलं. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली एकही टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळले नाहीत. 10 नोव्हेंबर 2022 रोजी इंग्लंडने उपांत्य फेरीत भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता.

1 / 8
टी20 संघाचं सध्या हार्दिक पांड्या याच्याकडे नेतृत्व सोपण्यात आलं आहे. त्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली टी20 खेळणार नाहीत, अशी जोरदार चर्चा रंगली आहे. टी20 क्रिकेटमध्ये नव्या दमाच्या खेळाडूंना संधी दिली जाणार असं सांगितलं जात आहे. त्यावर अखेर रोहित शर्मा याने मौन सोडलं आहे.

टी20 संघाचं सध्या हार्दिक पांड्या याच्याकडे नेतृत्व सोपण्यात आलं आहे. त्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली टी20 खेळणार नाहीत, अशी जोरदार चर्चा रंगली आहे. टी20 क्रिकेटमध्ये नव्या दमाच्या खेळाडूंना संधी दिली जाणार असं सांगितलं जात आहे. त्यावर अखेर रोहित शर्मा याने मौन सोडलं आहे.

2 / 8
"आम्ही काही प्रयोग करत आहोत. गेल्या वर्षी आम्ही असंच केलं होतं. 2022 मध्ये टी20 वर्ल्डकप होता. त्यामुळे आम्ही वनडे खेळलो नव्हतो. यावेळी वनडे वर्ल्डकप आहे. आम्ही टी20 क्रिकेट खेळत नाही कारण आमचं लक्ष आता वनडे क्रिकेटवर आहे.", असं रोहित शर्मा याने सांगितलं.

"आम्ही काही प्रयोग करत आहोत. गेल्या वर्षी आम्ही असंच केलं होतं. 2022 मध्ये टी20 वर्ल्डकप होता. त्यामुळे आम्ही वनडे खेळलो नव्हतो. यावेळी वनडे वर्ल्डकप आहे. आम्ही टी20 क्रिकेट खेळत नाही कारण आमचं लक्ष आता वनडे क्रिकेटवर आहे.", असं रोहित शर्मा याने सांगितलं.

3 / 8
"सर्व फॉर्मेट खेळून वर्ल्डकपची तयारी करू शकत नाहीत. दोन वर्षापूर्वी आम्ही हा निर्णय घेताल. रवींद्र जडेजा ऑगस्ट 2022 पासून एकही टी20 सामना खेळला नाही. तो सुद्धा या रणनितीचा भाग आहे", असंही रोहित शर्मा पुढे म्हणाला.

"सर्व फॉर्मेट खेळून वर्ल्डकपची तयारी करू शकत नाहीत. दोन वर्षापूर्वी आम्ही हा निर्णय घेताल. रवींद्र जडेजा ऑगस्ट 2022 पासून एकही टी20 सामना खेळला नाही. तो सुद्धा या रणनितीचा भाग आहे", असंही रोहित शर्मा पुढे म्हणाला.

4 / 8
वर्ल्डकप जवळ असल्याने फिटनेट चांगला असावा याकडे आमचं लक्ष आहे. आधीही खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहे. दुखापतीमुळे आमचं टेन्शन वाढलं आहे. बीसीसीआयशी चर्चा करून आम्ही असा निर्णय घेतला आहे, असंही रोहित शर्मा म्हणाला.

वर्ल्डकप जवळ असल्याने फिटनेट चांगला असावा याकडे आमचं लक्ष आहे. आधीही खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहे. दुखापतीमुळे आमचं टेन्शन वाढलं आहे. बीसीसीआयशी चर्चा करून आम्ही असा निर्णय घेतला आहे, असंही रोहित शर्मा म्हणाला.

5 / 8
जेव्हा कधी आम्हाला खेळाडूंना विश्रांती देण्याची संधी मिळते तेव्हा आम्ही तसं करतो. कारण यामुळे महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये फिटनेस चांगला राहतो. आमचे काही महत्त्वाचे खेळाडू गेल्या दोन वर्षात दुखापतीने त्रस्त आहेत. तसेच मोठ्या स्पर्धांना मुकले आहेत, अशी चिंताही त्याने यावेळी व्यक्त केली.

जेव्हा कधी आम्हाला खेळाडूंना विश्रांती देण्याची संधी मिळते तेव्हा आम्ही तसं करतो. कारण यामुळे महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये फिटनेस चांगला राहतो. आमचे काही महत्त्वाचे खेळाडू गेल्या दोन वर्षात दुखापतीने त्रस्त आहेत. तसेच मोठ्या स्पर्धांना मुकले आहेत, अशी चिंताही त्याने यावेळी व्यक्त केली.

6 / 8
चौथ्या क्रमांक गेल्या काही काळापासून आमच्यासाठी डोकेदुखी ठरला आहे. युवराज सिंगनंतर एकाही फलंदाजाला ती जागा भरता आलेली नाही. पण श्रेयस अय्यरने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

चौथ्या क्रमांक गेल्या काही काळापासून आमच्यासाठी डोकेदुखी ठरला आहे. युवराज सिंगनंतर एकाही फलंदाजाला ती जागा भरता आलेली नाही. पण श्रेयस अय्यरने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

7 / 8
पाठीच्या दुखापतीमुळे गेल्या काही महिन्यांपासून श्रेयस संघाबाहेर असल्याने संघाला मोठा धक्का बसला आहे, असंही त्याने पुढे सांगितलं.

पाठीच्या दुखापतीमुळे गेल्या काही महिन्यांपासून श्रेयस संघाबाहेर असल्याने संघाला मोठा धक्का बसला आहे, असंही त्याने पुढे सांगितलं.

8 / 8
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.