रायगड : सध्याचा पाऊस आणि पूर याची माहिती मिळाल्यानंतर जमेल त्या मार्गाने मदत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, महाडकडे येणारे सर्व रस्ते पाण्याखाली गेले होते. काही ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. या काळात लगतच्या ग्रामस्थांनी मदतकार्य केले. मदतकार्य करण्यामध्ये विलंब झाला. सध्या जे दुर्घटनाग्रस्त लोकं आहेत त्यांचं पुनर्वसन करणे गरजेचे आहे. त्याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे.