औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण आज औरंगाबादमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी मराठवाड्याच्या पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधले. मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्प हा आपल्यासाठी संजीवनी आहे. आज धरण 76 टक्के भरले आहे. आपल्याला ज्या प्रमाणात पाणी मिळायला पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. पणी वरच्या भागात जास्त दिलं जातंय. समन्यायी पाणी वाटपाकडे लक्ष द्या, असे अशोक चव्हाण म्हणाले.