मुंबई : आज संध्याकाळी नव्या मंत्र्यांना खाती मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. मागच्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. अखेर तो पूर्ण झाला आहे. आज संध्याकाळी नव्या मंत्र्यांना खाती मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. यावेळी त्यांनी मंत्रालयात जाण्यापूर्वी शिवेसनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना केसरकर यांनी अभिवादन केलं. यावेळी मंत्री संदीपान भुमरे, मंत्री संजय राठोड यांनी देखील अभिवान केलं आहे. यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलंय. आमदार बच्चू कडू नाराजी असल्याच्या प्रश्नावर देखील केसरकर यांनी भाष्य केलंय.