Iran- Israel War | भारतासाठी आनंदाची बातमी! होर्मुझची सामुद्रधुनी पार करुन जहाज मुंबईत दाखल
युद्ध थांबल्यानंतर लगेचच एक आंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय तेलवाहू जहाज 'ग्रीन आशा' मुंबईतील बंदरावर दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
आखाती देशातील युद्ध गेल्या 40 दिवसांपासून सुर होतं. इरण- इस्त्रायलमध्ये आजूनही तणाव कायम असला तरी अमेरिका आणि इरणमध्ये सीजफायर झालं आहे. या युद्धामुळे भारतासह अनेक देशांच्या इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला होता. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली होती. त्यामुळे भारतातही एलपीजीचे संकट निर्माण झाले. आता हे युद्ध थांबल्यानंतर लगेचच एक आंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय तेलवाहू जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईतील बंदरावर दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
‘ग्रीन आशा’ हे भारतीय जहाज तब्बल 15 टन एलपीजी घेऊन मुंबईत दाखल झाल्याचं सांगितलं जात आहे. जहाज होर्मुझची सामुद्रधुनी पार करून अखेर भारतात आलं आहे. जर कायमचं युद्धविराम झालं तर लवकरच जगभरातील ऊर्जा स्रोतांचा पुरवठा सुरळीत होईल.
Published on: Apr 09, 2026 1:22 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
