भारतात यंदा आयसीसी टी-20 विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार होते. मात्र कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे ही स्पर्धा युएईमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला. स्पर्धेचे सर्व अधिकार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे राहणार आहेत. दरम्यान आयसीसीने नुकतीछ विश्वचषकाच्या तारखा जाहिर करत सामने सुरु होण्याची तारीख आणि अंतिम सामना खेळवला जाण्याची तारीख ही जाहिर केली आहे. स्पर्धा सुरु होण्याची नेमकी तारीख आय़सीसीने सांगितली असून 17 ऑक्टोबर, 2021 रोजी स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार असल्याचेही आयसीसीने स्पष्ट केले. (ICC Men T 20 World Cup matches Will Start From 17 October to 14 November)