वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्र्यांमध्ये सव्वा तास बैठक झाली. भोंग्यांसाठी परवानगी बंधनकारक केल्याच्या निर्णयानंतर ही बैठक पार पडली आहे. भोंग्यावरून तापलेल्या राजकीय वातावरणावर या बैठकीअंतर्गत चर्चा झाल्याचं कळतंय. भोंग्यांसंदर्भात जाहीर होणाऱ्या नव्या नियमावलीवरही बैठकीत चर्चा झाली आहे.