Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात

Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात

| Updated on: Jul 03, 2026 | 4:27 PM

मुंबईतील अलीकडील पावसाळी दुर्घटनांवरून राजकीय वातावरण अधिकच तापले आहे, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. मॅनहोलमध्ये पडून झालेल्या नागरिकाच्या मृत्यूप्रकरणी विशेष सभागृह बोलावण्याची मागणी करत त्यांनी या घटनेची सखोल चर्चा आणि जबाबदारी निश्चित करण्याची गरज व्यक्त केली आहे.

मुंबईतील अलीकडील पावसाळी दुर्घटनांवरून राजकीय वातावरण अधिकच तापले आहे, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. मॅनहोलमध्ये पडून झालेल्या नागरिकाच्या मृत्यूप्रकरणी विशेष सभागृह बोलावण्याची मागणी करत त्यांनी या घटनेची सखोल चर्चा आणि जबाबदारी निश्चित करण्याची गरज व्यक्त केली आहे.

माध्यमांशी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, मुंबई महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर शहरात झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून, या घटनांसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवरही टीका करत, सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यात विरोधक कमी पडत असल्याचे मत व्यक्त केले. अशा गंभीर घटनांमध्ये केवळ आरोप-प्रत्यारोप न करता ठोस भूमिका घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मॅनहोल दुर्घटनेवर हसल्याच्या वादात अडकलेले भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यावरही संदीप देशपांडे यांनी निशाणा साधला. या प्रकरणामुळे जनतेच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा करत, भाजपने अमित साटम यांना मुंबई अध्यक्षपदावरून तातडीने हटवावे, अशी मागणी त्यांनी केली.

मुंबईतील सलग घडणाऱ्या पावसाळी दुर्घटनांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला असून, नागरिकांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत.

Published on: Jul 03, 2026 4:27 PM
Follow Us