राज्यात मुंबई, ठाणे, कोकणासह जवळपास सर्वंच भागात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. मुंबईतील विविध भागात पाणी साचलं आहे. अनेक घरं, दुकानात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालं आहे. मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून, दरड कोसळून आणि वाहून गेल्यामुळे काही जणांच्या मृत्यूच्या बातम्याही समोर आल्या आहेत. हा पाऊस शेतीसाठी चांगला असला तरी शहरी भागात या पावसामुळे मोठं नुकसान झालंय. महाराष्ट्रासह देशात आणि जगभरात अनेक भागात पावसानं हाहाकार घातलाय. त्याचाच आढावा घेणार हा रिपोर्ट