अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा हे काल बऱ्याच दिवासांनी अमरावतीत परतले. राणा दाम्पत्य अमरावतीत परततचा त्यांनी नागपुरात हनुमान चालीसा पठण करत सरकारवर पुन्हा जोरदार हल्लाबोल चढवाला. तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी अमरावतीत त्यांचे जंगी स्वागत केले. भव्य रॅलीही काढण्यात आली. तसेच रात्री उशीरापर्यंत दुग्धाभिषेक आणि इतर कार्यक्रम सुरूच होते. त्यानंतर आता आज पोलीस आक्रमक मोडवर आले आहेत. कारण पोलिसांनी एक दोन ठिकाणाी नाही तर तब्बल चार ठिकाणाी राणा दाम्पत्यावर गुन्हे दाखल केले आहेत.