कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखाण्याची निवडणूक आता तिरंगी होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. कारण सत्ताधारी पॅनलविरोधात एकत्र आघाडी तयार करण्याचे प्रयत्न फळाला येत नसल्याचं दिसतं आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात आघाडी तयार करण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रयत्न केले होते पण त्या मनोमिलनाच्या चर्चेतून बाहेर पडत असल्याचं चव्हाणांनी जाहीर केलं आहे.