Uddhav Thackeray UNCUT | उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा; येत्या रविवारी…

Uddhav Thackeray UNCUT | उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा; येत्या रविवारी…

| Updated on: Jul 03, 2026 | 1:18 PM

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठी राजकीय घोषणा केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या विरोधात राज्यव्यापी 'राम रक्षा आंदोलन' सुरू करण्याची घोषणा केली.

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठी राजकीय घोषणा केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या विरोधात राज्यव्यापी ‘राम रक्षा आंदोलन’ सुरू करण्याची घोषणा केली.

उद्धव ठाकरे यांनी आरोप केला की, राम मंदिरासाठी भाविकांनी दिलेला निधी चुकीच्या पद्धतीने वापरला जात असून, त्याचा उपयोग राजकीय पक्ष फोडण्यासाठी केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. याच पार्श्वभूमीवर येत्या रविवारी दादर येथील मारुती मंदिरापासून ‘राम रक्षा आंदोलन’ सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका करत, राम मंदिर आंदोलनातून भाजपला राजकीय लाभ झाला असून, आज त्याच मुद्द्याचा वापर सत्तेसाठी केला जात असल्याचा आरोप केला. “राम मंदिरासाठी अनेक शिवसैनिकांनी संघर्ष केला. त्या आंदोलनात आमचाही मोठा सहभाग होता. मात्र आज त्या श्रद्धेवरच घाला घातला जात आहे,” असे ठाकरे म्हणाले.

तसेच, राज्यात आणि देशात सुरू असलेल्या पक्षांतराच्या राजकारणावरही त्यांनी निशाणा साधला. आमदार-खासदार फोडण्याच्या राजकारणाला ‘ऑपरेशन’ अशी नावे दिली जात आहेत. आता राम मंदिराच्या नावाखालीही राजकारण सुरू असल्याचा आरोप करत, “भाजप ‘ऑपरेशन राम मंदिर’ राबवत आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, नागरिक अनेक समस्यांना सामोरे जात आहेत आणि या सर्व प्रश्नांच्या मुळावर प्रहार करण्याची वेळ आली आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरून पुन्हा जनतेसमोर जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, ‘राम रक्षा आंदोलन’ला सत्ताधारी पक्षाकडून काय उत्तर दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Published on: Jul 03, 2026 1:18 PM
Follow Us