Maharashtra News LIVE: राज्यावर पावसाचे मोठे संकट, पुढील काही तास धोक्याची..
Maharashtra News LIVE Updates : मुंबईत दोन दिवस पाणीबाणी असून काही भागातील पाणीपुरवठा 18 तास बंद राहणार आहे. पाच विभागांना याचा फटका बसणार आहे. हे विभाग कोणते, ते जाणून घ्या..

LIVE NEWS & UPDATES
-
जळगावच्या चोपडा येथे जुन्या वादातून तरुणाची हत्या
जळगावच्या चोपडा येथे जुन्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. प्रदीप राजेंद्र माळी असे हत्या झालेल्या मयत 35 वर्षीय तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चेतन कानडे या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. मयताच्या खिशात असलेल्या लग्न पत्रिकेवरून तसेच हातावरील टॅटू वरून ओळख पटल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींनी मयताची पान टपरी जाळल्याने जुना वाद होता याच वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे
-
चंद्रपूर चौथीच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यात शाळेत जाण्यासाठी तयार होत असलेल्या एका 10 वर्षीय विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू झालाय. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरातील ही घटना असून ईशान सत्यपाल आत्राम असं मृतक विद्यार्थ्यांचं नाव आहे. चौथ्या वर्गात शिकणारा ईशान सकाळी शाळेत जाण्यासाठी तयार होत असतानाच अचानक खाली कोसळला. पालकांनी त्याला तातडीने शहरातीलच एका रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
-
-
गिरणार–दुगाव रोडवर भीषण अपघात, मोठी खळबळ
वाळू गणपत थेटे गंभीर जखमी. सकाळी मारुती रायांच्या दर्शनासाठी जात असताना अपघात. अज्ञात पिकअप वाहनाची जोरदार धडक. धडकेनंतर चालक घटनास्थळावरून फरार. वाळू थेटे यांची प्रकृती चिंताजनक. फरार वाहनचालकाचा शोध सुरू. पोलिस तपास सुरू
-
अवकाळी पावसाने हळद उत्पादक शेतकऱ्यांच प्रचंड नुकसान
वाळू घातलेल्या हळदीच्या ताडपत्री वरून वाहत आहे पाणी. हळद भिजल्याने काळी पडणार. हळद उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता.. जिल्ह्यात मध्ये रात्री विजांच्या कडकडाटासह झाला अवकाळी पाऊस अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान
-
राज्यावर पावसाचे मोठे संकट, पुढील काही तास धोक्याची..
राज्यावर पावसाचे सावट आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांकरिता अत्यंत मोठा इशारा दिला. पुढील काही तास राज्यात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. काही भागात अवकाळी पावसाला सुरूवात देखील झाली. मुंबईसह उपनगरात ढगाळ वातावरण झाले असून पाऊसही पडत आहे.
-
-
पुणे जिल्ह्यातील वाकी बुद्रुकच्या भैरवनाथ पतसंस्थेत ६.५३ कोटींचा घोटाळा
पुण्याच्या खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथील भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत तब्बल ६ कोटी ५३ लाख ९२ हजार रुपयांचा आर्थिक घोटाळा उघडकीस आला असून, या प्रकरणी तब्बल ३६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संचालक मंडळ आणि संबंधितांनी संगनमताने ठेवीदारांचा विश्वासघात करत मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
-
उत्तर भारतामध्ये उष्णतेची लाट
उत्तर भारतामध्ये तापमानाचा पारा वाढणार असून, काही दिवसांत दिल्लीतील तापमान ४३ अंश सेल्सिअसवर जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. दिल्लीतील रिज स्टेशन, मुंगेशपूर, आयानगर आणि इतर हवामान केंद्रामध्ये रविवारी कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवण्यात आलं.
-
-
बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात दिलासा
बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात दिलासा मिळाला आहे. तात्पुरती जप्तीचे दिलेले आदेश रद्द करण्यात आले आहेत. भोसले यांच्या येस बँक आणि डीएचएफएल प्रकरणी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ‘येस बँक’ आणि ‘दिवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेड’च्या (डीएचएफएल) आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) न्यायालयात सुरू असलेल्या दाव्यात बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ED ने दिलेले तात्पुरत्या जप्तीचे आदेश न्यायालयाने रद्द करत, कारवाई मोठ्या प्रमाणात अस्थिर असल्याचे नमूद केले आहे. न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायाधीश मुनीश्वर नाथ भंडारी आणि सदस्य जी. सी. मिश्रा यांनी हा निकाल दिला असून आता पुढील प्रक्रिया लवकरात सुरू करण्यात येणार आहे.
-
बदलापूरला अवकाळी पावसाने झोडपलं; अचानक आलेल्या पावसामुळे बदलापूरकरांची तारांबळ
आज सकाळच्या सुमारास बदलापुरात ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. गेल्या दोन दिवसांपासून बदलापूर आणि ग्रामीण भागात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे होता. त्यानंतर सकाळी ढग भरून आले आणि बदलापूर परिसरात पावसाने हजेरी लावली. या पावसाचा सर्वाधिक फटका नोकरदार वर्गाला बसलाय. सकाळी कामावर जाण्याच्या गडबडीत पावसाने हजेरी लावल्यामुळे चाकरमान्यांना भिजत भिजतच रेल्वे स्टेशन गाठावं लागलय.
-
अक्षय तृतीयेला देशभरात २० टन दागिन्यांची खरेदी; दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर विक्री
अक्षय तृतीयेच्या दिवशी संपूर्ण देशात १८ ते २० टनांच्या आसपास सोन्या-हिऱ्यांच्या दागिन्यांची विक्री झाल्याचा अंदाज ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे (जीजेसी) अध्यक्ष राजेश रोकडे यांनी व्यक्त केला आहे. विशेषतः दक्षिण भारतातही मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. तेथे सकाळपासूनच लोकांनी सोन्याचे दागिने घ्यायला गर्दी केली होती, तर महाराष्ट्रात दुपारनंतर विक्री खऱ्या अथनि सुरू झाली आणि दुकाने रात्री उशिरापर्यंत उघडी होती, असेही ते म्हणाले. मागील वर्षीच्या अक्षय तृतीयेला १० ग्रॅमसाठी सोन्याचा भाव ९० हजार रुपये होता. तो आता एक लाख ५४ हजार रुपये आहे.
-
मुंबईत दोन दिवस पाणीबाणी, १८ तास पुरवठा बंद; पाच विभागांना फटका
मुंबईच्या दक्षिण आणि मध्य भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेने शिवडी येथे महत्त्वाचे तांत्रिक काम हाती घेतले आहे. शिवडी येथील हाजी बंदर मार्गावर १,५०० मिमी व्यासाचे दोन नवे ‘बटरफ्लाय व्हॉल्व’ बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे बुधवारी सकाळी १० वाजल्यापासून गुरुवारी पहाटे चारपर्यंत म्हणजे जवळपास १८ तास मुंबईतील ए, बी, सी, ई आणि एफ-दक्षिण या पाच विभागांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
-
नाशिकमधील TCS प्रकरणातील संशयित आरोपींकडून मोबाईल जप्त; व्हॉट्सअप ग्रुपची माहिती SIT तपासात समोर
नाशिकमधील TCS प्रकरणातील संशयित आरोपींकडून मोबाईल जप्त करण्यात आला. व्हॉट्सअप ग्रुपची माहिती SIT तपासात समोर आली आहे. दररोज ग्रुप लीडर ग्रुपमधून वेगवेगळे आक्षेपार्ह मेसेज पाठवून तरुणींचा छळ करत होत अशी सूत्रांची माहिती आहे. ऑफिसमध्ये दररोज नेटचा पासवर्ड अश्लील नावाने किंवा मुलींच्या धार्मिक भावना दुखावतील अशा पद्धतीने सेट केले जात असल्याचे देखील प्रकार समोर आले आहेत. तरुणी आणि महिलांचे लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींचा पुन्हा पोलीस ताबा घेऊन या प्रकरणात अधिकचा तपास केला जाणार आहे.
-
नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातच्या कोट्यवधींच्या प्रॉपर्टीवर ईडीकडून तात्पुरती टाच येण्याची शक्यता
नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातच्या कोट्यवधींच्या प्रॉपर्टीवर ईडीकडून तात्पुरती टाच येण्याची शक्यता आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ED कडून कारवाईला वेग आला आहे. ईडीकडून संबंधित मालमत्तांची तपशीलवार छाननी सुरू असून संशयित व्यवहारांमुळे कोट्यवधींची संपत्ती अडचणीत आली आहे. बोगस गुंतवणूक, फसवणूक आणि मनी लाँड्रिंगबाबत अद्याप तपास सुरू आहे. विविध ठिकाणी छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. पुढील काही दिवसांत मोठ्या कारवाईची शक्यता आहे.
-
नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका
नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. 65 हजार शेतकऱ्यांच्या 41 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. कृषी विभागाकडून मार्च मधील नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. 73 कोटींचा नुकसानभरपाई प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आला आहे. 410 गावांमध्ये शेतीचं नुकसान झालं असून 65,756 शेतकरी बाधित झाले आहेत. तर 34,136 हेक्टरवरील कांदा पिकाचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. डाळिंब 4,584 हेक्टर, गहू 1,231 हेक्टर, भाजीपाला 189 हेक्टर नुकसान झालं आहे.
फळपिकांसाठी स्वतंत्र 11 कोटींच्या मदतीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. हेक्टरी 8,500 ते 22,500 रुपयांपर्यंत मदत देण्याची तरतूद आहे. सिन्नर, निफाड, दिंडोरी, मालेगावसह अनेक तालुक्यांना फटका बसला आहे.
मुंबईच्या दक्षिण आणि मध्य भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेने शिवडी इथं महत्त्वाचे तांत्रिक काम हाती घेतलं आहे. शिवडी इथल्या हाजी बंदर मार्गावर 1500 मिमी व्यासाचे दोन नवे ‘बटरफ्लाय व्हॉल्व’ बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे बुधवारी सकाळी 10 वाजल्यापासून गुरुवारी पहाटे चारपर्यंत म्हणजे जवळपास 18 तास मुंबईतील ए, बी, सी, ई आणि एफ-दक्षिण या पाच विभागांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर दुसरीकडे भोंदू खरातच्या कोट्यवधींच्या प्रॉपर्टीवर ईडीकडून तात्पुरती टाच येण्याची शक्यता आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून कारवाईला वेग आला आहे. ईडीकडून संबंधित मालमत्तांची तपशीलवार छाननी सुरू आहे. संशयित व्यवहारांमुळे कोट्यवधींची संपत्ती अडचणीत आली आहे. बोगस गुंतवणूक, फसवणूक आणि मनी लाँड्रिंगबाबत अद्याप तपास सुरू आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी, देश-विदेश, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
Published On - Apr 21,2026 8:09 AM
