AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharshtra News LIVE : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनातील हजारो झाडे तोडण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला स्थगिती

| Updated on: Aug 21, 2026 | 8:40 AM
Share

Maharashtra News LIVE Updates : आज मुंबईतील मद्रासवाडी सबवे ते वरळी प्रोमेनेड दरम्यान ‘महा वॉकेथॉन' स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनातील हजारो झाडे तोडण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, देश-विदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील इतरही अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

Maharshtra News LIVE : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनातील हजारो झाडे तोडण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला स्थगिती

LIVE NEWS & UPDATES

  • 21 Aug 2026 08:57 AM (IST)

    कर्जमुक्ती साठी पात्र, मात्र मयत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण रखडले

    कर्जमुक्ती साठी पात्र, मात्र मयत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण रखडले आहेत, ज्यामुळे मयत शेतकऱ्यांच्या वारसांच्या अडचणी वाढल्या आहेत.  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत मयत शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचा अडथळा, यादीतील शेतकरी मयत असल्याने अनेक कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण रखडले आहेत. मयत कर्जदारांच्या वारसांची बँकेत नोंद करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदेश आहेत. वारसांची नोंद करून कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी बँकांना तातडीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

  • 21 Aug 2026 08:55 AM (IST)

    नागपुरात भर पावसाळ्यात तापमानाचा पारा वाढला, रोज ढगाळ वातावरण मात्र तापमानात वाढ

    नागपुरात भर पावसाळ्यात तापमानाचा पारा वाढला, रोज ढगाळ वातावरण मात्र तापमानात वाढ होत आहे. तापमानाचा पारा 32.2 अंश सेल्सिअस वर गेला असून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या 24 तासात 3.8 अंश सेल्सिअसने पारा वाढला आहे, हे विदर्भातील सर्वाधिक तापमान होते. गेल्या दोन आठवड्या पासून पावसाने दडी मारली आहे. पुढील सात ते आठ दिवस पावसाची श्यक्यता नसल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

  • 21 Aug 2026 08:50 AM (IST)

    अमरावतीत आदिवासी विद्यार्थी राजेश बेठेकर मृत्यू प्रकरण

    15 ऑगस्टच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने व महर्षी शाळेच्या हलगर्जीपणामुळे राजेश बेठेकर या आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर पाच विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले… यामुळे आदिवासी संघटना आक्रमक झाल्या असून महर्षी शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. महर्षी शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून महर्षी शाळेच्या हलगर्जीपणा समोर आला.

  • 21 Aug 2026 08:45 AM (IST)

    अमरावतीत आदिवासी विद्यार्थ्यांचे अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयात आंदोलन सुरूच…

    अमरावतीत आदिवासी विद्यार्थ्यांचे अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयात आंदोलन सुरूच आहे.  शेकडो विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी रात्र उघड्यावरच जागून काढली. आदिवासी विद्यार्थ्यांच्या बेमुदत ठिय्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. अमरावती मधील महर्षी शाळेत अकरावी मध्ये शिकणाऱ्या राजेश पेठेकर या विद्यार्थ्यांचा मृत्यूप्रकरणी महर्षी शाळा प्रशासनावर सदोषमनुष्य वधाचे गुन्हे दाखल करून शाळेची कायमस्वरूपी मान्यता रद्द करण्याची मागणी होत आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलनातून माघार घेणार असल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे..

  • 21 Aug 2026 08:40 AM (IST)

    दहिसर – गांजा शेती पर्दाफाश – अल्पवयीनाकडून महिलेवर चाकू हल्ला

    मुंबईच्या दहिसरमध्ये गांजा शेतीचा पर्दाफाश करणाऱ्या अल्पवयीन मुलाला धमकावणाऱ्या महिलेवर चाकूने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. बोरीवली MHB पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गणपत पाटील नगर गल्ली क्रमांक 4 मध्ये रात्री 9 च्या सुमारास सुमन ठाकूर या महिलेवर एका अल्पवयीनाने चाकूने वार केले. काही दिवसांपूर्वी या परिसरात घरात गांजा शेतीचा प्रकार उघड झाला होता. त्याच प्रकरणाशी संबंधित असल्याने महिलेने अल्पवयीनाला धमकावले होते. रागाच्या भरात अल्पवयीनाने हल्ला केला आणि स्वतःचा व्हिडिओ बनवून गुन्हा कबूल केला. पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे तपास सुरू केला आहे.

  • 21 Aug 2026 08:31 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगर : आयटी पार्कमागे भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

    छत्रपती संभाजीनगर येथील आयटी पार्कमागे भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक मारली. दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. निखिल आणि कपिल आरके या भावांचा अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे.  बीडचे रहिवासी असलेले दोन्ही भाऊ कामानिमित्त दोन महिन्यांपूर्वी संभाजीनगरात आले होते. कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एमआयडीसी सिडको पोलिसांकडून शोध सुरू आहे.

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनातील हजारो झाडे तोडण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती देत झाडांबाबतची माहिती सादर करण्याचे प्रशासनाला आदेश दिले आहे. वृक्षतोड प्रकरणावरील याचिकेची सुनावणी 8 सप्टेंबर पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या जलसंधारण विभागातर्फे जलसंधारण दिनानिमित्त अमरावतीत महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी महाविद्यातुन या रॅलीचा प्रारंभ होणार आहे. पाण्याचे महत्त्व, जलसंधारण, मृदू संधारण, तसेच भविष्यातील पाणी सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर जलसंधारण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. आज मुंबईतील मद्रासवाडी सबवे ते वरळी प्रोमेनेड दरम्यान ‘महा वॉकेथॉन 2026 – Walk for Water’ आणि रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, देश-विदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील इतरही अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

Published On - Aug 21,2026 8:25 AM

Follow Us
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा