AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : पावसाचा जोर ओसरला, काही जिल्ह्यांना यलो अलर्ट

| Updated on: Jul 10, 2026 | 8:14 AM
Share

Maharashtra News LIVE : गेल्या दोन आठवड्यापासून दमदार बॅटिंग करणाऱ्या पावसाने जराशी उसंत घेतली आहे. पावसाचा जोर ओसरला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. ते पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे.

Maharashtra News LIVE : पावसाचा जोर ओसरला, काही जिल्ह्यांना यलो अलर्ट

LIVE NEWS & UPDATES

  • 10 Jul 2026 08:50 AM (IST)

    फुलंब्रीतील सिद्धेश्वर दूध डेअरीवर एफडीएची धाड

    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्रीतील सिद्धेश्वर दूध डेअरीवर एफडीएची धाड टाकली. 3 हजार 500 लिटर संशयित दूध आणि दूध पावडर जप्त करण्यात आली. 1 लाख 32 हजार रुपयांचे संशयित दूध जागेवरच नष्ट करण्यात आले. सिद्धेश्वर आणि शिवकृपा या दोन्ही डेअरींना टाळे ठोकण्यात आले.हे दूध मराठवाडा मिल्क प्रोड्युसर कंपनी आणि गुजरातमधील पंचमहल दूध संघाला पुरवल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला. एफडीए आणि पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

  • 10 Jul 2026 08:40 AM (IST)

    हतनुर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

    जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील 9 पर्जन्यमापन केंद्रांवर मागील 24 तासात एकूण 284.4 मि.मी आणि सरासरी = 31.6 मि.मी. एवढी पावसाची नोंद झाल्याची माहिती हतनूर प्रशासनाने दिले आहे सध्या स्थितीत धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले असून 5000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग होत आहे

  • 10 Jul 2026 08:30 AM (IST)

    आजपासून सप्तशृंगी देवी मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले

    आजपासून सप्तशृंगी देवी मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले करण्यात येत आहे. अतिमुसळधार पावसाचा इशारा संपल्यानंतर जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर दर्शनासाठी बंद होता. आज सकाळपासून भाविकांना नियमित दर्शनाची सुविधा सुरु करण्यात आली आहे. सहा तालुक्यांतील शाळाही आजपासून नियमितपणे सुरू होत आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात होत आहे.

  • 10 Jul 2026 08:20 AM (IST)

    बोगस बियाणांचा शेतकऱ्यांना मोठा फटका

    लातूर जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांना बोगस बियाणांचा फटका बसला आहे, कृषी विभागाकडे आता पर्यंत 120 शेतकऱ्यांनी बोगस बियाणे पेरणी नंतर उगवलेच नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. लातूर जिल्ह्यातले शेतकरी प्रामुख्याने सोयाबीनची लागवड करतात. अनेक कंपन्यांची बियाणे लागवडी नंतर उगवलेलेच नाही,त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. आता शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागते आहे. शेतकऱ्यांना बोगस बियाणांमुळे आर्थिक फटका बसला आहे. बोगस बियाणांच्या कंपन्यांवर कार्यवाही करा आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या, अशी मागणी करण्यात येत आहे. रेणापूर तालुक्यातल्या पानगाव येथेही उन्नती कंपनीच्या बोगस बियाणांचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

  • 10 Jul 2026 08:10 AM (IST)

    सांगली धरण परिसरात आणि जिल्ह्यात पावसाची उघडीप, कृष्णेच्या पाणी पातळीत कमालीची घट

    सांगली जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांच्या मुसळधार पावसानंतर आता पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे धरणात होणाऱ्या पाण्याच्या आवकेत घट झाली असून कृष्णा नदीची पाणी पातळी मध्ये कमालीची घट झाली आहे. रात्री 30 फुटावर गेलेली कृष्णा नदी आता नदीची पाणीपातळी सकाळी 25 फूट 6 इंच झाली आहे. त्यामुळे सांगली कराना दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसां पासून पडत असणारा पाऊस यामुळे कृष्णा नदी मध्ये कमालीची वाढ होत होती. काल 30 फुटावर नदीची पाणी पातळी गेली होती. मात्र पावसाने उघडीप दिल्याने नदीची पाणीपातळी आता घटू लागली आहे.

  • 10 Jul 2026 08:01 AM (IST)

    आंबेगाव तालुक्यात ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस

    आंबेगाव तालुक्यात ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे शेती, घरे, रस्ते आणि वीजपुरवठ्याचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील यांनी बाधित भागांचा दौरा करून अधिकाऱ्यांना पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आणि रस्ते व वीजपुरवठा युद्धपातळीवर सुरळीत करण्याचे आदेश दिले आहेत.

    भूस्खलनग्रस्त भागांची पाहणी करत त्यांनी नागरिकांशी संवाद साधून धीर दिला. तसेच एकही शेतकरी किंवा बाधित नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही, यासाठी महसूल व कृषी विभागाने संयुक्तपणे अचूक पंचनामे करून शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Maharashtra News LIVE : राज्यात पावसाने गेल्या दोन आठवड्यापासून थैमान घातले होते. मुंबई, ठाणे, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्हे, विदर्भ आणि उर्वरीत राज्यातील अनेक भागात कोसळधार दिसली. तर गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. आज काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागाला पावसाचा तडाखा बसू शकतो. शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीने महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसले. संजय राऊत यांनी या भेटीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील पाच सहा खासदार अस्वस्थ असल्याचे मोठे विधान केले आहे. ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषाने पुण्यनगरी दुमदुमली. टीईटी घोटाळ्यात अजून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर मुसळधार पावसामुळे रेल्वे वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला. दुरुस्ती आणि इतर कामासाठी डेक्कन क्वीनसह काही गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.

Published On - Jul 10,2026 8:00 AM

Follow Us
विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या
Big Breaking | विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या राष्ट्रवादीत चाललंय तरी काय?
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना फोन केला अन्...
भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना ठाकरेंचा सवाल; दानपेटीची चोरी...
Aaditya Thackeray | दानपेटीची चोरी करणाऱ्यांसोबत जाणार का? भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना आदित्य ठाकरेंचा सवाल
भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
Pune | पुण्यात आज भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर..
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात मुख्यमंत्र्यांसह...
आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली; पालखी मार्गावर..
Alandi | पालखी मार्गावर महिलेचा हायव्होल्टेज राडा! आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या 4 बड्या नेत्यांनी घेतली CM फडणवीसांची भेट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या 4 बड्या नेत्यांनी घेतली CM फडणवीसांची भेट, काय झाली चर्चा?
कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर शेतकऱ्यांचं झाडावर चढून आंदोल
Mumbai Farmer Protest | शेतकऱ्यांचा संताप शिगेला! कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर झाडावर चढून आंदोलन
वसई-विरारच्या पुरावरून विधानसभेत राडा! आदित्य ठाकरे-भातखळकर आमनेसामने
वसई-विरारच्या पुरावरून विधानसभेत राडा! आदित्य ठाकरे-भातखळकर आमनेसामने