AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बर्ड फ्लूचा कहर, 4 लाख कोंबड्या आणि 24 लाख अंडी नष्ट, केंद्रीय पथक होणार दाखल…

नंदूरबारच्या नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूने कहर केला असून आता पर्यंत तिसऱ्या येथे बर्ड फ्लुचा शिरकाव झाला आहे. काय आहे नेमकी येथील परिस्थिती पाहूयात....

| Updated on: May 17, 2026 | 4:43 PM
Share
नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव गंभीर स्वरूप धारण करताना दिसत आहे. आतापर्यंत ४ लाख ६ हजार कोंबड्या आणि कलिंग  २४ लाख ९१ हजार अंडी आणि मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ नष्ट करण्यात आले आहेत.या मोठ्या नुकसानीची केंद्र सरकारने दखल घेतली असून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुढच्या आठवड्यात केंद्रीय पथक नवापूरमध्ये दाखल होणार आहे. पाहूया यावरील टीव्ही ९ मराठी चॅनलचे प्रतिनिधी जितेंद्र बैसाणे यांचा सविस्तर रिपोर्ट..

नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव गंभीर स्वरूप धारण करताना दिसत आहे. आतापर्यंत ४ लाख ६ हजार कोंबड्या आणि कलिंग २४ लाख ९१ हजार अंडी आणि मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ नष्ट करण्यात आले आहेत.या मोठ्या नुकसानीची केंद्र सरकारने दखल घेतली असून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुढच्या आठवड्यात केंद्रीय पथक नवापूरमध्ये दाखल होणार आहे. पाहूया यावरील टीव्ही ९ मराठी चॅनलचे प्रतिनिधी जितेंद्र बैसाणे यांचा सविस्तर रिपोर्ट..

1 / 5
नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात तिसऱ्यांदा बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. नवापूरमधील ९ पोल्ट्री फार्मचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर केंद्रीय पथक आता पुढच्या आठवड्यात नवापूरमध्ये दाखल होणार आहे.लाखोंची अंडी आणि खाद्यपदार्थ नष्ट करण्यात आल्याने पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. नुकसानग्रस्त पोल्ट्री व्यावसायिकांनी अधिक मदतीची मागणी केली आहे.

नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात तिसऱ्यांदा बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. नवापूरमधील ९ पोल्ट्री फार्मचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर केंद्रीय पथक आता पुढच्या आठवड्यात नवापूरमध्ये दाखल होणार आहे.लाखोंची अंडी आणि खाद्यपदार्थ नष्ट करण्यात आल्याने पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. नुकसानग्रस्त पोल्ट्री व्यावसायिकांनी अधिक मदतीची मागणी केली आहे.

2 / 5
 नवापूरमधील हा बर्ड फ्लूचा हा तिसरा प्रादुर्भाव असून यापूर्वी २००६ आणि २०२१ मध्येही अशा घटना घडल्या होत्या. आता पुन्हा एकदा बर्ड फ्लूने पोल्ट्री उद्योगाला मोठा फटका दिला आहे. आतापर्यंत ९ पोल्ट्री फार्मचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, या बाधित फार्मच्या परिसरातील १५ पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्या आणि अंडी नष्ट करण्याची प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

नवापूरमधील हा बर्ड फ्लूचा हा तिसरा प्रादुर्भाव असून यापूर्वी २००६ आणि २०२१ मध्येही अशा घटना घडल्या होत्या. आता पुन्हा एकदा बर्ड फ्लूने पोल्ट्री उद्योगाला मोठा फटका दिला आहे. आतापर्यंत ९ पोल्ट्री फार्मचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, या बाधित फार्मच्या परिसरातील १५ पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्या आणि अंडी नष्ट करण्याची प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

3 / 5
 बाधित पोल्ट्री फार्ममधील नुकसानग्रस्तांना शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार असून, प्रति कोंबडी १४० रुपये, प्रति अंडे ४ रुपये आणि प्रति किलो खाद्यपदार्थासाठी २५ रुपये मदत देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच ज्या ठिकाणी पक्षी नष्ट केले  आहेत, त्या परिसराचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त संजय खाचने यांनी म्हटले आहे.

बाधित पोल्ट्री फार्ममधील नुकसानग्रस्तांना शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार असून, प्रति कोंबडी १४० रुपये, प्रति अंडे ४ रुपये आणि प्रति किलो खाद्यपदार्थासाठी २५ रुपये मदत देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच ज्या ठिकाणी पक्षी नष्ट केले आहेत, त्या परिसराचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त संजय खाचने यांनी म्हटले आहे.

4 / 5
 बर्ड फ्लूच्या वाढत्या प्रादुर्भावाची आणि झालेल्या नुकसानीची माहिती घेण्यासाठी आता केंद्रीय पथक नवापूरमध्ये दाखल होणार आहे. या पथकाच्या अहवालानंतर केंद्र सरकारकडून पुढील उपाययोजना आणि मदतीबाबत काय निर्णय घेतले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बर्ड फ्लूच्या वाढत्या प्रादुर्भावाची आणि झालेल्या नुकसानीची माहिती घेण्यासाठी आता केंद्रीय पथक नवापूरमध्ये दाखल होणार आहे. या पथकाच्या अहवालानंतर केंद्र सरकारकडून पुढील उपाययोजना आणि मदतीबाबत काय निर्णय घेतले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

5 / 5
Follow Us
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरे असं म्हणाले? धाराशिवमधील
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरेंच्या विधानाने सगळेच अवाक्; धाराशिवमधील नगरसेवकांच्या बैठकीत असं काय घडलं?