दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रासह शुक्रवारी रात्री उत्तर भारतातील बर्याच भागात 6.1 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. रात्री साडे दहाच्या आसपास हा भूकंप झाला. नॅशनल सिस्मोलॉजिकल सेंटरच्या म्हणण्यानुसार, भूकंपाचे केंद्रबिंदू पंजाबच्या अमृतसर येथे होते आणि ते दहा किमीच्या खोलीवर केंद्रित होते. आतापर्यंत तरी जीवित हानी किंवा मालमत्तेचं नुकसान झालेलं कोणतंही वृत्त आलेलं नाही.