AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ravrambha : साताऱ्यातील ‘अजिंक्यतारा’मध्ये रावरंभा चित्रपटाचे शुटिंग सुरू, खासदार उदयनराजेंनी दिली भेट

साताऱ्यातील अजिंक्यतारा याठिकाणी रावरंभा चित्रपटाचे शुटिंग सुरू आहे. धुलिवंदनाच्या दिवशी चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांनी शुटिंगस्थळी भेट दिली. 'रावरंभा' या चित्रपटाची निर्मिती शशिकांत पवार करत आहेत. बेभान, झाला बोभाटा, भिरकीट असे चित्रपट केलेले अनुप अशोक जगदाळे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.

| Edited By: | Updated on: Mar 19, 2022 | 9:23 AM
Share
साताऱ्यातील अजिंक्यतारा याठिकाणी रावरंभा चित्रपटाचे शुटिंग सुरू आहे. धुलिवंदनाच्या दिवशी चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांनी शुटिंगस्थळी भेट दिली. 'रावरंभा' या चित्रपटाची निर्मिती शशिकांत पवार करत आहेत. बेभान, झाला बोभाटा, भिरकीट असे चित्रपट केलेले अनुप अशोक जगदाळे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.

साताऱ्यातील अजिंक्यतारा याठिकाणी रावरंभा चित्रपटाचे शुटिंग सुरू आहे. धुलिवंदनाच्या दिवशी चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांनी शुटिंगस्थळी भेट दिली. 'रावरंभा' या चित्रपटाची निर्मिती शशिकांत पवार करत आहेत. बेभान, झाला बोभाटा, भिरकीट असे चित्रपट केलेले अनुप अशोक जगदाळे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.

1 / 5
खासदार उदयनराजे भोसले चित्रपटाच्या शुटिंगस्थळावर आल्यावर त्यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. यावेळी अजिंक्यतारा किल्ल्यावर उदयनराजेंच्या उपस्थितीत चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली.

खासदार उदयनराजे भोसले चित्रपटाच्या शुटिंगस्थळावर आल्यावर त्यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. यावेळी अजिंक्यतारा किल्ल्यावर उदयनराजेंच्या उपस्थितीत चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली.

2 / 5
ऐतिहासिक कथानक मांडण्यात हातखंडा असलेल्या प्रताप गंगावणे यांनी “रावरंभा”चं लेखन केलं आहे. इतिहासाच्या पानांमध्ये रावरंभा ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक अनोखी प्रेमकहाणीही दडली आहे. ही प्रेमकहाणीच रावरंभा या चित्रपटातून पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर येत आहे.

ऐतिहासिक कथानक मांडण्यात हातखंडा असलेल्या प्रताप गंगावणे यांनी “रावरंभा”चं लेखन केलं आहे. इतिहासाच्या पानांमध्ये रावरंभा ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक अनोखी प्रेमकहाणीही दडली आहे. ही प्रेमकहाणीच रावरंभा या चित्रपटातून पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर येत आहे.

3 / 5
संजय जाधव यांच्यासारख्या सिनेमॅटोग्राफरच्या दृष्टिकोनातून चित्रीत होणारी रावरंभा ही ऐतिहासिक प्रेमकहाणी प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरेल यात मुळीच शंका नाही. या चित्रपटाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यात चित्रित होणारा हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट ठरणार आहे.

संजय जाधव यांच्यासारख्या सिनेमॅटोग्राफरच्या दृष्टिकोनातून चित्रीत होणारी रावरंभा ही ऐतिहासिक प्रेमकहाणी प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरेल यात मुळीच शंका नाही. या चित्रपटाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यात चित्रित होणारा हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट ठरणार आहे.

4 / 5
रावरंभा ही ऐतिहासिक प्रेमकहाणी असणाऱ्यात चित्रपटात कलाकार ओम भूतकर, अशोक समर्थ, संतोष जुवेकर,रोहित चव्हाण, संजय पाटील, विनायक चौगुले, कार्यकारी निर्माता अन्वय नायकवडी, प्रशांत नलवडे, पंकज चव्हाण आहेत. सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक अनोखी प्रेमकहाणीही या चित्रपटात आहे.

रावरंभा ही ऐतिहासिक प्रेमकहाणी असणाऱ्यात चित्रपटात कलाकार ओम भूतकर, अशोक समर्थ, संतोष जुवेकर,रोहित चव्हाण, संजय पाटील, विनायक चौगुले, कार्यकारी निर्माता अन्वय नायकवडी, प्रशांत नलवडे, पंकज चव्हाण आहेत. सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक अनोखी प्रेमकहाणीही या चित्रपटात आहे.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.