AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ODI World Cup : 2011 वर्ल्डकप स्पर्धेत धोनी याने शेवटी मारलेल्या ‘त्या’ षटकाराबाबत गंभीरनं केलं मोठं वक्तव्य, म्हणाला..

वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळणार आहे. वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत असेल.

| Updated on: Aug 24, 2023 | 10:32 PM
Share
भारताने गेल्या 10 वर्षात एकही आयसीसी चषक जिंकलेला नाही. त्यामुळे वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद जिंकून दुष्काळ संपवण्याची संधी आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणार आहे.

भारताने गेल्या 10 वर्षात एकही आयसीसी चषक जिंकलेला नाही. त्यामुळे वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद जिंकून दुष्काळ संपवण्याची संधी आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणार आहे.

1 / 6
टीम इंडियाने पहिल्यांदा 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वात वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर 28 वर्षानंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात 2011 मध्ये टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला होता.

टीम इंडियाने पहिल्यांदा 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वात वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर 28 वर्षानंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात 2011 मध्ये टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला होता.

2 / 6
2011 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अंतिम फेरीचा सामना भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात रंगला. या सामन्यात महेंद्रसिंह धोनी याने षटकार मारत सामना जिंकवला होता. त्याला प्लेयर ऑफ द मॅचच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.

2011 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अंतिम फेरीचा सामना भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात रंगला. या सामन्यात महेंद्रसिंह धोनी याने षटकार मारत सामना जिंकवला होता. त्याला प्लेयर ऑफ द मॅचच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.

3 / 6
अंतिम फेरीत गौतम गंभीर याने 97 धावांची खेळी केली होती. दुसरीकडे युवराज सिंह याला प्लेयर ऑफ द टूर्नामेंटने गौरविण्यात आले होते. पण चाहते आजही धोनीच्या त्या षटकाराची चर्चा करत आहे. यावर गंभीरने एका मुलाखतीत संताप व्यक्त केला आहे.

अंतिम फेरीत गौतम गंभीर याने 97 धावांची खेळी केली होती. दुसरीकडे युवराज सिंह याला प्लेयर ऑफ द टूर्नामेंटने गौरविण्यात आले होते. पण चाहते आजही धोनीच्या त्या षटकाराची चर्चा करत आहे. यावर गंभीरने एका मुलाखतीत संताप व्यक्त केला आहे.

4 / 6
गौतम गंभीर याने सांगितलं की, "एक खेळाडू स्पर्धा जिंकवू शकत नाही. जर असं झालं असतं तर भारत सर्व वर्ल्डकप जिंकला असता. मी 97 धावा केल्या त्याबाबत काही बोलू नका. पण युवराज सिंह, जहीर खान आणि मुनाफ पटेल यांनीही चांगली कामगिरी केली होती."

गौतम गंभीर याने सांगितलं की, "एक खेळाडू स्पर्धा जिंकवू शकत नाही. जर असं झालं असतं तर भारत सर्व वर्ल्डकप जिंकला असता. मी 97 धावा केल्या त्याबाबत काही बोलू नका. पण युवराज सिंह, जहीर खान आणि मुनाफ पटेल यांनीही चांगली कामगिरी केली होती."

5 / 6
"सचिन तेंडुलकर यानेही या वर्ल्डकपमध्ये तीन ते चार शतकं ठोकली होती. किती लोकांना याबाबत माहिती आहे. लोकं आजही त्या एका षटकाराबाबतच चर्चा करत आहेत. हे फक्त मीडिया आणि सोशल मीडियामुळे झालं आहे.", असंही गंभीर पुढे म्हणाला.

"सचिन तेंडुलकर यानेही या वर्ल्डकपमध्ये तीन ते चार शतकं ठोकली होती. किती लोकांना याबाबत माहिती आहे. लोकं आजही त्या एका षटकाराबाबतच चर्चा करत आहेत. हे फक्त मीडिया आणि सोशल मीडियामुळे झालं आहे.", असंही गंभीर पुढे म्हणाला.

6 / 6
Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...